तुळजापूर,दि.०२:  
तुळजापुर लातुर रोड बायपास चौकामध्ये भीषण अपघात
उस्मानाबादहुन बायपास मार्गी लातुरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअपने चौकात उभा असलेल्या इरटीगासह  तुळजापूरहुन लातुरकडे  जाणाऱ्या कारला  समोरासमोर धडक देवुन झालेल्या अपघातात सात वर्षाच्या मुलासह अन्य  तिघेजण  गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि २ रोजी  सकाळी साडे अकरा वाजता घडली.

 तुळजापूर नागपूर - रत्नागिरी महामार्गावरच्या बाह्यवळण रस्ता चौकात हा आपघात घडला असुन गंभीर चार जखमी पैकी तिघांना उपचारासाठी सोलापूर हलवले आहे. तर अन्य एकास उस्मानाबाद येथिल रुग्णालयात पाठवले आहे .


उस्मानाबादहुन बायपास मार्गाने वायरींग घेऊन लातुरकडे  जाणारा पिकअपने  (क्र. एम.एच. ०५ डी.के. ५९४१)   तुळजापूरहुन लातुरकडे जाणारी कार (क्र .के.ए.०३ एन.डी.५३८५)  आणि  लातुरहून तुळजापूरकडे येणाऱ्या व चौकात उभा राहिलेल्या इरटीगा (क्र एम.एच.२४ ए.एफ.५८०८ ) या कारला समोरून जोराची धडक दिल्याने पिक चालक नागेश प्रकाश देवरे वर्षे ३५ रा. मुरबाड, ता.शहापूर जि.ठाणे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर  उपजिल्हा रूग्णालय तुळजापूर येथे प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी  जिल्हा रूग्णालय उस्मानाबाद येथे दाखल करण्यात आले आहे. तर कारमधील अमित बिराजदार ,अनिता तमके,
हर्णेश अमित बिराजदार वय ७ वर्षे रा.लातुर याना  सोलापूर येथे उपचारासाठी हलविले आहे .
 
Top