उस्मानाबाद, दि. 21 
जिल्हयात सोमवार दि. 24 मे रोजी पासून जनता कर्फ्युमध्ये सुट देण्यात आली असुन सोमवार रोजी पासुन   अत्यावश्यक सेवेबरोबरच जीवनावश्यक सेवांना ढील देण्यात आली आहे.
 सकाळी 7 ते 11 या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत. 
यामध्ये फळे,  भजीपाला , दुध संकलन व वितरण , किराणा दुकाने, बेकरी मिठाई, चिकन मटन, मासे, अंडी दुकाने यासह पेट्रोल पंप यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश आहे.

तसेच सर्व बँका, पोस्ट ऑफिस, कृषी दुकाने  दुपारी 2 पर्यंत सुरू राहणार आहेत. आठवडयातील प्रत्येक शनिवार व रविवार जनता कर्फ्यु  लागू राहणार आहे. 

 
Top