काटी,दि.०२ :  
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जेष्ठ नागरिक शिवाजी  व्यंकटराव देशमुख वय ८४ यांचे  रविवार दि. २ मे रोजी पहाटे पाच वाजण्याच्या   दरम्यान कोरोनामुळे  निधन झाले.
 त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 


त्यांच्या पार्थिवावर तुळजापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यामार्फत त्यांच्या शेतामध्ये  अंत्यसंस्कार करण्यात आले.

 रावसाहेब देशमुख व प्रभाकर देशमुख यांचे ते वडील होत. आठवडाभरातील काटी येथील  कोरोनाचा हा पाचवा बळी आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
 
Top