उस्मानाबाद दि.२२ :
 ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा विविधांगी विकास साधण्याबरोबरच खास सरपंचासाठीच कार्यरत असलेल्या सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र या संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हा समन्वयकपदी  जहागीरदारवाडी ता. उस्मानाबाद  येथील राज शशिकांत राठोड यांची निवड करण्यात आली आहे.  


राज राठोड यांच्या निवडीचे पत्र सरपंच परिषदचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे व सरचिटणीस विकास जाधव यांनी  दिले आहे.  पत्रात  नमूद केले आहे की,  परिषदचे सभासद वाढविण्याबरोबरच तालुकास्तरावर समन्वयकांच्या निवडी करून संघटनेच्या ध्येय धोरणानुसार काम करावे. तसेच संघटना वाढीसाठी प्रयत्न करावेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील सरपंचांच्या असणाऱ्या विविध अडीअडचणी  मांडून त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.  प्रत्येक गावातील सरपंचांना या संघटनेत सामावून घेऊन त्यांना न्याय देणार असल्याचे राठोड यांनी सांगितले. 

या निवडीबद्दल प्रदेश उपाध्यक्ष अनिल गीते- पाटील, प्रदेश महासचिव विकास जाधव, राज्य महिला अध्यक्षा राणी पाटील, प्रदेश कोअर कमिटीचे प्रमुख अविनाश आव्हाड, राज्य महिला उपाध्यक्षा अश्विनी थोरात, सुप्रिया जेथे यांनी  अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.


सरपंच परिषद ही सरपंचाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणारी आक्रमक संघटना म्हणून राज्यात नावारूपास आली आहे. तसेच या संघटनेच्या माध्यमातून सरपंचांच्या समस्या बरोबरच गावस्तरीय विकासात्मक कामे करण्यासाठी उद्भवणाऱ्या अडचणी बाबत अनेक निर्णय शासनास घ्यायला भाग पाडले आहे.



 
Top