लोहारा,दि.२६: 
शहरातील नागरिकांना शुध्द पाणी माफक दरात मिळावे, यासाठी सौ.ताई राजेंद्र कुंभार यांनी आपली आई कै.इंदूबाई चंनबसप्पा कुंभार यांच्या स्मरणार्थ तहसील रोडवर आरओं प्लाँट उभा केला आहे.

 बुधवारी  दि..२६ मे रोजी प्लँटचे उद्घाटन जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक आविनाश माळी, जि.प.सदस्या सौ.मीरा माळी यांच्या हस्ते करण्यात आले. अवघ्या पाच रूपये किमतीत वीस लिटर शुध्द न् थंड पाणी देण्यात येणार आहे. 
त्यामुळे सामान्य नागरिकांना या आरो प्लँटचा फायदा होणार आहे.

 शहरात थंड जारचा व्यवसाय जोरात आहे. वीस ते तीस रूपयाला जार विकाला जातो. परंतु सामान्य नागरिकांना परवडत नसल्याने शुध्द पाण्याऐवजी नगरपंचायतच्या पाण्यावर तहान भागवावी लागते. नागरिकाना शुध्द व थंड पाणी नाममात्र किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील कुंभार कुटुंबियानी पुढाकार घेत तहसील रोडवर आरोओ प्लँट उभा केला .

त्याचा शुभारंभ बुधवारी जिल्हा सहकार बोर्ड संचालक  अविनाश माळी व माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.मीरा माळी यांच्या हस्ते करण्यात आला. एक लिट शुध्द पाण्याची बाटली दोन रूपये तर २० लिटरचे जार अवघ्या पाच रूपयामध्ये 'ना नफा ना तोटा' या तत्वावर देण्यात येत आहे.


 यावेळी माजी पंचायत समिती सदस्य दीपक रोडगे, युवक काँग्रेस शहरध्यक्ष  हरी लोखंडे,  कुंभार,सौ.ऋतुजा संजय कुंभार, मदन कुलकर्णी , राजेंद्र कदम,  श्रीशैल्य स्वामी,  लक्ष्मण रोडगे, पत्रकार   निलकंठ कांबळे,  गणेश खबुरे,  यशवंत भुसारे, कल्याण ढगे,  बळी रोडगे,   राम सगट,  सुखदेव रोडगे,  सिद्राम नरुणे   बाजीराव भोंडवे आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  श्रीपाद कुंभार, श्रीकांत कुंभार,  समर्थ कुंभार,सौ.मिनाक्षी कुंभार आदीनी पुढाकार  घेतला
 
Top