इटकळ ,दि.१४ 
इटकळ ता. तुळजापूर येथे नानजी देशमुख कृषीसंजिवनी प्रकल्पांर्गत ई ग्रामसभा  शुक्रवार  दि.१४ रोजी पार पडली.

शुक्रवार रोजी  सकाळी  ११ वाजता इटकळ सरपंच,उपसरपंच,प्रगतीशील शेतकरी,ग्रामपंचायत सदस्य,यांच्या सहकार्याने ई ग्रामसभा घेण्यात आली.

यावेळी  नानाजी  कृषीसंजिवनी प्रकल्प गावात ग्रामसंजीवनी समीती स्थापन करण्यात आली.कृषीमित्र व कृषीताई निवड करण्यात आली.  

 विशेषयज्ञअधिकारी (कृषी)सचिन पांचाळ यांनी प्रक्लपाची सविस्तर माहिती दिली.

खरीप हंगाम पुर्व तयारी, तर प्रकल्प तज्ञ (मनुष्य बळ व विकास) रविराज फुगारे यांनी सुक्षम नियोजन, मृगसंधारण यांची माहिती दिली. यासाठी समुहसहाय्यक श्रीकृष्ण मुळे यांनी ई ग्रामसभा घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले. 

यावेळी सरपंच राजश्री बागडे,सचिव बालाजी कदम, कृषी साह्यायक आर के दुधभाते ,फिरोज मुजावर,अरविंद पाटील व ग्रामपंचायत सदस्य उपस्थितीत होते.


 
Top