तुळजापूर, दि. ३ :डॉ. सतीश महामुनी
तुळजापूर शहरातील भिमनगर येथील नागरीकांचे अंत्यविधी गेले अनेक वर्षे पर्यायी जागा रामदरा तलावा शेजारील पार्किंगच्या पाठीमागे उघड्यावरच अंत्यसंस्कार करतात, अचानक पाऊस आल्यास मृतांची हेळसांड होते.
अंत्यविधी व्यवस्थित करण्यासाठी तेथेच स्वतंत्र निवारा शेड उभारण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे युवक नेते सागर कदम यांनी भीमनगर येथील नागरिकांच्या वतीने केली आहे.
तसेच भिमनगर मधील लोकसंख्येनुसार येथील नागरीकांना पर्यायी स्मशानभूमी तातडीने निवारा शेड उभारण्यात यावे अशी मागणी निवेदन सागर कदम यांनी नगपालिका अधिक्षक वैभव पाठक यांना दिले.
या निवेदनावर नागेश कदम, दिपक कदम, अरूण अप्पा कदम, योगेश सोनवणे, बापू कदम, पोपट भालेकर, संजय कदम, गोकूळ कदम, सुशिल कदम, चेतन कदम, सुदर्शन कदम आदि नागरीकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.