उस्मानाबाद, दि.2 :
रुईभर ता.उस्मानाबाद येथील डॉ. गिरीश बळीराम जाधव (वय 53) यांचे दि. 1 जूनच्या मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते गेल्या 20 वर्षापासून रुईभर येथे वैद्यकीय सेवा देण्याचे काम करीत होते. रात्री अपरात्री रुईभरसह पंच क्रोषीतील अनेकाना त्यांनी दवाखाण्याचा माध्यमातून आधार दिला. अनेकाना मोफत उपचार केले. त्यांचा स्वभाव अतिशय चांगला होता. त्यांच्या जाण्याने दवाखान्याच्या बाबतीतील आधार नाहीसा झाला आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे रुईभर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज बुधवारी ( दि.2) रोजी सकाळी 8:30वाजण्याच्या सुमारास रुईभर येथे शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा, एक मुलगी, असा परिवार आहे.