चिवरी,दि.२ : 
 गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने संपूर्ण जिल्ह्यात थैमान घातले होते. यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे तसेच जमिनी , विहीरी,खरडुन अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, यावेळी नुकसान झालेल्या पिकांचे व जमिनीचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून तलाठी व कृषी अधिकारी यांना देण्यात आले होते, परंतु  तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील तलाठी व कृषी अधिकारी यांनी   मनमानी कारभार करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्याचा पंचनामा करूनही यादीतून नावे वगळण्यात आल्याचे उघडकीस आले आहेत .



 नुकत्याच जाहीर केलेल्या अतिवृष्टी व पूरग्रस्त बाधित शेतकऱ्याची अनुदान वाटप यादी 2020 यामध्ये येथील केवळ सव्वीस शेतकऱ्यांची नावे आलेली आहेत, येथे अकराशे शेतकरी खातेदार आहेत. केवळ मोजक्याच शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे, येथील अनेक शेतकरी   पूरग्रस्त बाधित अनुदानापासून वंचित राहिले आहेत, पंचनामा होऊनही यादीमध्ये नाव न आल्याने वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
 
Top