कळंब ,दि.२४ :  
मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नगरपरिषदेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष पवार यांच्यासह ५ जणाविरुध्द कळंब पोलिसात  गुन्हा दाखल करण्यात आल्याने न. प वर्तुळात खळबळ उडाली आहे

 संसर्गजन्य कोरोनाच्या  पार्श्वभुमीवर अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी मास्क वापर, सोशल डिस्टन्सींग  आदी प्रकरणी मनाई आदेश जारी केले आहेत.

दि .22 जून रोजी या आदेशांचे उल्लंघन करुन कल्पनानगर पारधी पिढी येथे  सुभाष पवार,
छाया पवार , आशा पवार  ,अच्युत पवार , नितीन पवार , तानाजी पवार या सर्वांनी  मास्क न लावता एकत्र जमून कोरोना संसर्गाची शक्यता निर्माण होण्याची घातक कृती केली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.


यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) सह साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम- 2, 3, 4 अंतर्गत कळंब पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
 
Top