उस्मानाबाद ,दि.२
कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी जारीकेलेल्या विविध मनाई आदेशांचे उल्लंघन करुन 1)समीर रशिद लोणी 2)राम चंद्रकांत वजनम, दोघे रा. उमरगा 3)मोतीराम किशनराव बेळमकर, रा. गंजोटी 4)प्रभाकर किसन राठोड, रा. निलुनगर तांडा, तुरोरी या चौघांनी दि. 01 जून रोजी अनुक्रमे आपापल्या ताब्यातील कापड दुकान, पानटपरी, पुष्पमयुरी गृहीणी सेवा केंद्र, किराणा दुकान ही दुकाने व्यवसायाच चालू ठेवले असल्याचे उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले. तर 5)दिलीप मुरलीधर सोनमाळी, रा. वारदवाडी, ता. परंडा यांनी याच दिवशी गावातील आपले सिंहगड हॉटेल व्यवसायास चालू ठेवले असल्याचे परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले.
अशा प्रकारे नमूद पाच जणांनी जिल्हाधिकारी यांचे मनाई आदेश डावलून व कोविड- 19 संसर्गाच्या शक्यतेची निष्काळजीपणाची कृती करुन भा.दं.सं. कलम- 188, 269 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) सह कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद पाच जणांविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे स्वतंत्र 5 गुन्हे नोंदवले आहेत.