तुळजापूर दि १६ :
स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसी समाजाला असणारे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी आघाडीकडून हे आरक्षण मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्या अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील भाजपाची बैठक १६ जून रोजी उस्मानाबाद येथे संपन्न झाली . हे आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली.
येथील प्रतिष्ठान भवन कार्यालयात भाजपा ओबीसी मोर्चाची ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर ओबीसी मोर्चाची बैठक संपन्न झाली.
ओबीसी आरक्षण पुन्हा मिळावे यासाठी पुढील दिशा ठरविण्याबाबत व पुन्हा स्थापित करण्यासाठी पदाधीका-यांना भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे व ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे यांनी मार्गदर्शन केले. राज्य सरकारच्या दुर्लक्षाचा भूमिकेमुळे ओबीसी समाजाला हा फटका बसला आहे तो अधिकार परत मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीच्या वतीने राज्यभर सर्व जिल्ह्यात प्रयत्न करण्यात येत आहेत. जोपर्यंत ओबीसीचा राजकीय आरक्षणाचा अधिकार पुन्हा प्रस्थापित होत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील. असा इशारा या बैठकीत भाजप नेत्यांनी दिला आहे.
यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. खंडेराव चौरे, ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव पिराजी मंजुळे, ओबीसी आरक्षण संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने, ज्येष्ठ मार्गदर्शक पांडुरंग लाटे , जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर बोदर, नंदकुमार माळी, बालाजी गावडे , राजाभाऊ सोनटक्के, बाळासाहेब वाडकर, नगरसेवक युवराज नळे, दाजी पवार, मनोज पवार, संतोष क्षीरसागर, ज्ञानेश्वर सूळ, सतीश कदम ,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.