लोहारा , दि . ३०

1993 मध्ये भूकंपानंतर अनेक शेतकऱ्यांनी शहर वस्ती निर्माण करण्यासाठी तत्कालीन ग्रामपंचायत ८ अ नुसार प्लॉट जागा खरेदी विक्री केली आहे. उर्वरित प्लॉट धारक शेतकऱ्यांना दुय्यम निबंधक श्रेणी एक  कार्यालयातील अधिकारी "एन ए "ची अट घालत असल्याने सदर बाब अन्यायकारक असल्याने तात्काळ आपल्या स्तरावरून भूकंपामध्ये काही प्लॉट विक्री केल्याने उर्वरित प्लॉट "एन ए " करणे अवघड असल्याने ८ अ नुसार खरेदी विक्री करण्यासाठी जसे होते ,त्याच पद्धतीने कायम करावे अशी मागणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष आयुब हबीब शेख यांनी तहसीलदार मार्फत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना लेखी निवेदन दिले आहे.


 सदर निवेदन नायब तहसीलदार रणजित शिराळकर यांना देण्यात आले आहे .दिलेल्या निवेदनात उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात 1993 साली भूकंप झाले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने भूकंप भागात अनेक शेतकऱ्यांनी वस्ती निवास वास्तव्य करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात नकाशा व ग्रामपंचायतला सार्वजनिक नागरिकांच्या प्रयोजनासाठी खुले जागा मूळ मालकाकडून दुय्यम निबंधक कार्यालयाकडून ग्रामसेवक यांच्या नावे दस्त करून  ग्रामपंचायतला जागा देण्यात आली आहे. त्यानुसार मूळ मालकाचे  ८ अ तयार करण्यात आले होते.

     
भूकंपामध्ये अनेक शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत ८ अ नोंदणी प्रमाणे वस्तीसाठी काही प्लॉट खरेदी विक्री केली आहे. तर आज ही अनेकांच्या शेतातील काही प्लॉट उर्वरित क्षिल्लक आहेत. दुय्यम निबंधक कार्यालयाकडून एन ए ची अट सांगितले जात असल्याने अनेक शेतकऱ्याच्या शेतातील उर्वरित प्लॉट चें एन ए करता येणार नाही. लोहारा शहरातील ग्रामपंचायत नंतर नगरपंचायत अस्तित्वात आले आहे. भूकंपानंतर अनेकांनी तत्कालीन ग्रामपंचायत मध्ये  शेतकऱ्यांनी जागेचे 8 अ ला नोंद केली आहे . तर  आज घडीला नगर पंचायत अस्तित्वात आलेले आहे. तत्कालीन ग्रामपंचायत व भूकंपानंतर 8 अ नोंद नुसार आज घडीला अनेक शेतकऱ्यांनी  कुटूंबाचा गाडा हकण्यासाठी वेळेनुसार प्लॉट विक्री करीत आहेत ,तर काही प्लॉट अर्धवट आज ही आहेत. परंतु अचानक प्लॉट विक्रीसाठी एन ए ची अट अधिकारी सांगत असल्याने एक प्रकारे शेतकऱ्यांची कुचंबणा केली जात आहे. 

लोहारा तालुका हे ग्रामीण भागातील तालुका असून भूकंप प्रवण क्षेत्र असल्याने व येथील शेतकऱ्यांनी भूकंपामध्ये ग्राम पंचायत व तात्कालीन शहरासाठी नगर पंचायत मध्ये जुन्याच नोंदी असल्याने अर्धवट प्लॉट खरेदी विक्री तात्काळ चालू करण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेश देऊन येथील शेतकऱ्यावर होणारे अन्याय दूर करावे , अशी मागणी लोहारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

 या निवेदनावर शहराध्यक्ष आयुब हबीब शेख, नवाज सय्यद, राजेंद्र कदम, सुरेश वाघ, आमीन सुंबेकर,शब्बीर गवंडी, ताहेर पठाण, रियाज खडीवाले,मिलिंद नागवंशी, अजीज शेख, सह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 
Top