गावस्तरांवरील पथदिवे सुरू करण्यासाठी मंत्र्यांना घातले साकडे
सरपंच परिषदेच्या टीमनी घेतली शरद पवार यांची भेट
तुळजापूर , दि . १८
मागील एक महिन्यापासून गावोगावी असलेले पथदिवे बंद आहेत या संदर्भात सरपंच परिषद पुणे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांची भेट घेऊन पथदिव्यांचा वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली आहे.
15 व्या वित्त आयोग अंतर्गत केंद्र सरकारने ग्रामपंचायत निधी दिला आहे यातील बहुतांश निधी विकास कामे व कोरोनावर खर्च झाला आहे या निधीतून आराखड्यातील मूलभूत आणि पायाभूत असलेले कामे करणे गरजेचे आहे, पथदिव्यांचे वीज बिले 15 व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीने भरावे असे आदेश राज्य सरकारने काढले आहेत हा आदेश ग्रामपंचायतीच्या हक्कावर घाला घालणार आहे,पथदिव्यांच्या बाबत योग्य तो निर्णय घेऊन तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी सरपंच परिषदेने केली आहे.
सरपंच परिषद टीमनी यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन संवाद करत निवेदन देण्यात आले, यावेळी यावेळी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले,प्रदेश कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ,मार्गदर्शक शंकरराव खापे, राज्य कार्यकारणी सदस्य कोहिनूर सय्यद, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सुजित हंगरेकर, के पी पाटील यांची उपस्थिती होती