उस्मानाबाद , दि .४

तुळजापूर पोलीस ठाणे : शेत जमीन वाटणीच्या कारणावरुन खंडाळा, ता. तुळजापूर येथील हरीओम शंकर पाटील यांना त्यांचा भाऊ- भावजय रामचंद्र व विजयालक्ष्मी यांसह पुतण्या- ओंकार यांनी दि. 19.06.2021 रोजी 14.00 वा. शेतात शिवीगाळ करुन लोखंडी गजाने, चपलेने, दगडाने मारहान केली. अशा मजकुराच्या हरीओम पाटील यांनी दि. 03 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

कळंब पोलीस ठाणे : रविंद्र हरकर, रा. कळंब यांच्या कळंब येथील किराणा दुकानासमोर दि. 03 ऑगस्ट रोजी 09.00 वा. अजय, यशपाल, संघपाल गाडे या तीघा भावांसह भिमराव व धम्मपाल अशा पाच जणांनी भेळ विक्री हातगाडा लावला होता. तो गाडा दुकानासमोर लावण्यास रविंद्र यांनी आक्षेप घेतला असता नमूद पाच पुरुषांनी रविंद्र यांना शिवीगाळ करुन लोखंडी गज, दगड व चाकूने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या रविंद्र हरकर यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 506, 147, 148, 109 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top