नळदुर्ग , दि .९ : प्रा डॉ दिपक जगदाळे 

 सर्व जाती धर्मातील दिनदुबळ्या नागरीकांना सोबत घेऊन समाजकार्य करणारे एक महान व्यक्तिमत्त्व काळाने हिरावून नेले आहे, असे विचार बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केले . 


 नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात स्व . सि. ना.आलुरे गुरुजी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मधुकरराव चव्हाण हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष संभाजीराजे बाभळगावकर हे उपस्थित होते .

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय कोरेकर यांनी केले . याप्रसंगी पुढे बोलताना मधुकरराव चव्हाण म्हणाले की, आपल्या हाताखाली चांगली पिढी निर्माण व्हावी यासाठी गुरुजींनी शिक्षकाची नोकरी स्विकारली व एक आदर्श पिढी निर्माण केली . शिक्षण क्षेत्रातील त्यांचे काम हे अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे . ग्रामिण भागातील विद्यार्थी  कसा मोठा होईल. यासाठी त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली . राजकीय क्षेत्रात काम करताना मित्रत्व व शत्रुत्व कसे करावे याची शिकवण गुरुजींनी आम्हांला दिली म्हणूच आम्ही चौघांनी राजकारनाच्या माध्यमातून समाजसेवा केली. या पन्नास, साठ वर्षाच्या कालावधीत  आम्ही उभ्या केलेल्या या संस्था टिकविण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे .

 यावेळी बालाघाट शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष संभाजीराजे पाटील बाभळगावकर संचालक रामदादा आलुरे, सहसचिव शहबाज काजी ,नगरसेवक विनायक अहंकारी ,सामाजिक कार्यकर्ते मारुती बनसोडे , यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शित्रे , महाविद्यालयातील प्रा नेताजी जाधव , प्रा पांडुरंग पोळे , सतीश महामुनी  यांनी आपले मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रमास संस्थेचे सहसचिव प्रकाशराव चौगुले ,कोषाध्यक्ष  ॲड प्रदीप मंटगे ,सुभाष कोरे यांच्यासह गावातील नागरीक व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .  
 
Top