तुळजापूर , दि.२३
माळेवाडी (बोरगांव) ता. माळशिरस, जि. सोलापूर येथील मातंग समाजाचे सरपंच दशरथ साठे यांच्या भावाचे निधन झाल्याने गावातील जातीवादी व गुंड प्रवृत्तीच्या समाज कंटकांनी त्यांचा अंतविधी सार्वजनिक स्मशानभूमीत करण्यास विरोध केला आहे.सदरील घटना मागास जातीस दडपण्याचे, भ्याड कृत्य आहे.एवढेच नाही तर गावातील संबंधीत दुकानदारांना अंत्यविधीस लागणारे साहित्य देण्यास मज्जाव करणाऱ्या गाव गुंडांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तुळजापूर तालुका भिम-अण्णा सामाजिक संघटनेच्या वतीने दि.२३ रोजी नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे यानां निवेदनाद्वारे केला आहे.
संबंधित घटनेतील गांव गुंडावर ॲट्रासिटी कायदयांन्वये गुन्हा दाखल करून कायदेशीर कडक कारवाई करा व त्वरीत अटक करावी, तसेच पिडीत कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळावे, अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भिमअण्णा सामाजिक सघटनेने दिला आहे.
या निवेदनावर किसन देडे, जयराम क्षीरसागर,सुरेश मस्के, कृष्णा डोलारे, दिपक शिंदे, आकाश शिंदे, अभिमान सगट आदी प्रमुख पदाधिका-यांच्या सह्या आहेत.