उमरगा , दि .२७ :
आगामी निवडणूकीच्या अनुषंगाने पक्षावाढीसाठी पहिल्यांदाच प्रहार पक्षाची बांधणीला सुरुवात झाली आहे. सुस्त प्रशासकीय यंत्रणेला त्रासलेले, सर्व दिव्यांग, निराधार, कामगार आणि शेतकरी बंधूचा कल प्रहार पक्षात होताना दिसून येत आहे.
तर बरेच काही पक्षातील पदाधिकारी आणि काही सत्ताधारी सदस्य प्रहार जनशक्ती पक्षात सामील होणार असल्याचे उमरगा प्रहार सेवक सुरज आबाचाने यांनी माहिती दिली.
रविवारी दि 29 ऑगस्ट रोजी उमरगा येथे आयोजित सदस्य नोंदणी अभियानांतर्गत जास्तीत जास्त युवकांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षात सामील व्हावे असे प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सयाजीराव देशमुख आणि दिव्यांग विभागाचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांनी आवाहन केले आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमास संघटनेचे उस्मानाबाद जिल्ह्याध्यक्ष सयाजी देशमुख, प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे उस्मानाबाद जिल्ह्याध्यक्ष मयूर काकडे, जिल्हा उपाध्यक्ष राचय्या स्वामी,बाळासाहेब कसबे, नवनाथ मोहिते , बाळासाहेब पाटील, जमीर शेख, शशिकांत मुळे , नागनाथ पाटील, महंमद शेख, अनिल महाबोले आदिसांह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.