उस्मानाबाद , दि .०१

 परंपरागत अंधश्रद्धा, चालीरीती आणि रूढींना अण्णाभाऊ साठे यांनी लेखणीतून वाचा फोडण्याचे काम केले. लेखक,विचारवंताचे साहित्य,वाचन चळवळ वाढीला लागावी याकरिता शिक्षण विभागाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेत लवकरच वाचनालय सुरु करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी दिली.


साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
      जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये अस्मिता कांबळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी बी.आर.हजारे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी आर. वी.पिंपळे यांची यावेळी उपस्थिती होती.
        साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी विचार मांडताना जि.प.अध्यक्षा कांबळे  म्हणाल्या,महापुरुषांचे विचार टिकावे आणि वैचारिक प्रगल्भता वाढविण्यासाठी साहित्य वाचनाची गरज आहे. सध्या आषाढाचा महिना सुरू आहे. या महिन्यात कोंबड्या बकऱ्यांचा बळी दिला जातो ही अनिष्ट प्रथा स्वतःपासून बंद व्हायला हवी.जिल्हा परिषदेमध्ये अद्ययावत वाचनालय असावे यासाठी आपण आग्रही आहोत. विविध विभागात कार्यरत असणारे अधिकारी-कर्मचारी साहित्यिक आहेत त्यांनी लिहिलेले साहित्य सर्वांना उपलब्ध व्हावे, याकरिता लवकरच शिक्षण विभागाच्या माध्यमातून वाचनालय सुरु केले जाणार आहे असे कांबळे म्हणाल्या.
      अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमाप्रसंगी सभागृहामध्ये उपकार्यकारी अभियंता (बांधकाम) एच. आर.शेगर,आरोग्य विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी एल.जी.गिरी,प्राथमिक शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी यु.एम. उंबरे,समाज कल्याण विभागाचे निरीक्षक एन.डी.शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद प्रयाग,आरोग्य विभागाचे कनिष्ठ प्रशासनाधिकारी संजय धोंगडे,वित्त विभागाचे सहाय्यक लेखाधिकारी सुनील सोनवणे,पाणी व स्वच्छता मिशन चे निरीक्षक गादगे, वरिष्ठ सहाय्यक एफ.एस. पटेल,भांडार विभागाचे प्रमुख,वरिष्ठ सहाय्यक मधुकर कांबळे,कनिष्ठ सहाय्यक कचुर शेख यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
 
Top