उस्मानाबाद , दि . ०२

उमरगा पोलीस ठाणे :  आपल्या मुलास चापट मारल्याचा जाब भारतनगर, उमरगा येथील दुर्गामा इबतोळे या. गल्लीतील रणजित संजू विभूते यांना विचारण्यास दि. 01 ऑगस्ट रोजी 19.30 वा गेल्या. यावेळी रणजित यांसह विभूते कुटूंबातील लक्ष्मी, संजू, शिवम अशा चौघांनी चिडून जाउन दुर्गामा इबतोळे यांसह त्यांच्या पती व मुलास शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली व लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या दुर्गामा इबतोळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत बलभीम येवते, रा. मळगीवाडी, ता. उमरगा हे दि. 30 जुलै रोजी 19.15 वा. सु. आष्टा (ज.) -चिंचकोट रस्त्याने मोटारसायकलने जात होते. यावेळी धानोरा (द.) येथील नितीन थिटे यांसह 10 ग्रामस्थ एका एसयुव्ही कारमधून तेथे आले. “सोसायटीने दिलेल्या कर्जाचा विषय तु पंचायत समिती सभागृहात का काढला ?” असा जाब त्यांनी बलभीम यांना विचारून ठार मारण्याच्या उद्देशाने बलभीम यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. तसेच काठी, कोयत्याचा धाक दाखवून “आमच्या नादी लागल्यास तुझे खानदान संपवू.” अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या बलभीम येवते यांनी दि. 01 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम 307, 143, 147, 148, 149, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

आंबी पोलीस ठाणे : तिंत्रज, ता. भुम येथील लांडे कुटूंबातील संगीता, बापू, दत्ता, वैजिनाथ, बाबु, सुरेखा, लाडू, पायल, शहाजी, सुलन, लहु, अंकुश यांसह हिराबाई व सुनिल भोसले अशा 13 जणांनी शेतजमीन वाटणीच्या कारणावरुन दि. 31 जुलै रोजी 16.00 वा. सु. तिंत्रज शेत शिवारात नातेवाईक- सुरेखा मोहन लांडे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, कुऱ्हाड, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या सुरेखा लांडे यांनी दि. 01 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 323, 324, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
Top