मुरुम,  दि. १२  : 

श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना लि., मुरुम ता. उमरगा  या कारखान्याचा गळीत हंगाम २०२१-२२ साठी रोलर पुजनाचा व हायड्रोलिक ट्रिपलर बांधकामाचे भुमीपूजन कार्यक्रम कारखान्याचे चेअरमन बसवराज पाटील यांच्या हस्ते नुकतेच  संपन्न झाला. 


यंदाच्या हंगामात कारखान्याचे ५ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून सदर हंगामासाठी लागणाऱ्या तोडणी वाहतूक यंत्रणेची भरती करण्यात आली आहे. मशिनरी ओव्हरहॉलींग, दुरुस्तीची कामे युध्द पातळीवर चालु आहे. अनेक अडथळयावर मात करत कारखान्याची यशस्वी वाटचाल चालु असून येणारा गळीत हंगाम सुध्दा योग्य व नियोजनबध्द पध्दतीने सर्व संचालक मंडळ व आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडेल, अशी खात्री कारखान्याचे चेअरमन  बसवराज पाटील यांनी व्यक्त केली


सदर कार्यक्रमास जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापुराव पाटील, जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते  शरण पाटील,  कारखान्याचे व्हाईस चेअरमन सादिकमियाँ काझी, उमरगा जनता बँकेचे चेअरमन रामकृष्णपंत खरोसेकर, कारखान्याचे संचालक शरणप्पा पत्रिके, केशव पवार, विठ्ठलराव बदोले, विठ्ठलराव पाटील, दिलीप भालेराव, शिवलिंग माळी, माणिक राठोड, राजु हेबळे, सुभाष पाटील, उमरगा पंचायत समिती सभापती सचिन पाटील, जिल्हा परिषदचे माजी सदस्य गुंडाप्पा भुजबळ, ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. बी. अथणी, चिफ इंजिनियर ए. एल. अष्टेकर, चिफ केमीस्ट एस. बी. गायकवाड, मुख्य शेतकी अधिकारी ए.बी. राखेलकर, कार्यालय अधिक्षक के. एम. चौगुले, सर्व अधिकारी, कामगार, कर्मचारी उपस्थित होते.
 
Top