काटी , दि .०२
तामलवाडी ता. तुळजापूर येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुवार रोजी भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी दिनानिमित्त इयत्ता आठवी ते बारावीच्या किशोरवयीन मुलींसाठी बाल विवाह प्रतिबंधक संवाद कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुभाष जाधव तर प्रमुख पाहुणे पर्यवेक्षक गणेश हलकरे हे होते. तर सामाजिक अंतर ठेवून शिक्षक सुहास वडणे व श्रीमती मनीषा सावंत यांनी ग्रामीण भागातील मुलींच्या बाल विवाह विषयक विविध समस्या व अडचणी यावर सविस्तर विचार मांडले तसेच बालविवाह प्रतिबंध या कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली .
यावेळी ज्येष्ठ शिक्षक औदुंबर माडजे,चंद्रकांत साळुंखे, चांगदेव सावळे, प्रभाकर जाधव, शिवकुमार सिताफळे, सुहास वडणे, महादेव मसुते,महादेव माळी,लक्ष्मण पाटील, विनोद कुंभार,प्रशांत चुंगे,बालाजी साठे , गिरीश जाधव,योगेश राऊत, गणेश स्वामी,बालाजी रणसुरे, दत्तू कोकरे,सुनील पाटील, महिला शिक्षिका श्रीमती शाहिदा पिरजादे, मनिषा गिरे, मनीषा सावंत, विठाबाई पाटील आदी उपस्थित होते. यावेळी एस.डी.वडणे यांनी सूत्रसंचालन केले .