नळदुर्ग , दि . २५ :

संकटसमयी स्वत;च्या मोबाईलवरून सर्व गावक-यांना एकाच वेळी कॉलच्या माध्यमातुन सुचना देणे , सावध करणे किंवा मदतीला बोलावण्यासाठी उपयुक्त यंत्रणा पोलिस ठाणे व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विदयमाने गावात होणा-या विविध गुन्हयाना आळा घालण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत नळदुर्ग येथे ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण शिबीर शनिवार दि . 25  डिसेंबर रोजी संपन्न  झाले . 



ग्राम सुरक्षा यंत्रणा , उस्मानाबाद जिल्हा पोलिस दल व जिल्हा परिषद उस्मानाबाद यांचा संयुक्त विदयमाने आयोजित या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर  ग्राम सुरक्षा यंञाणा  संचालक डि. के गोर्डे ,  उपविभागीय पोलिस आधिकारी सई भोरे पाटील ,   सहाय्यक पोलिस निरीक्षक  जगदीश राऊत , सुधीर मोटे आदि उपस्थित होते. 

नळदुर्ग  पोलीस ठाण्याच्या हाद्दीतील 99  गावात ग्राम सुरक्षा  यंत्रणा  प्रभावीपणे राबविण्यासाठी तथा ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी शनिवारी  नळदुर्ग पोलीस ठाणे अंतर्गत  गावातील पोलीस पाटील,  सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, पोलीस कर्मचारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी  ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी.के. गोर्डे यांनी उपस्थितांना यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी  डि.के. गोर्डे उपस्थितांना मार्गदर्शन करताना  म्हणाले की, मागील काही वर्षात पुणे, नाशिक, सातारा, अहमदनगर जिल्ह्यातील गावे ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाली असून सर्व नागरिक ग्राम सुरक्षा यंत्रणेचे ॲपद्वारे आपापले मोबाईल नंबर नोंदवून यंत्रणा वापरत असल्याची माहिती देऊन ग्रामीण भागात सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावी ठरत असल्याचे सांगितले.


जिल्ह्यात ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. यामुळे चोरी,दरोडा यासारख्या घटनांमध्ये तात्काळ मदत मिळणार आहे.चोर,दरोडेखोर जागेवर जेरबंद करण्यास ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून संकट काळात स्वतःच्या मोबाईलवरुन  सर्व गावकऱ्यांना एकाच वेळी कॉलच्या माध्यमातून सुचना देणे, सावध करणे, किंवा मदतीला बोलावण्यासाठी हि यंत्रणा उपयुक्त असून पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या गावात मालमत्तेसंदर्भात व शरीराविरुध्द होणारे गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी चोरी, दरोडे, आग, जळीतांच्या, आपत्कालीन परिस्थितीत, ग्रामसभा, सरकारी सुचना आदी घटनांमध्ये सर्वांना एकाचवेळी  सुचना देण्यासाठी सर्वांसाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर 18002703600 वर नोंदी केलेल्या नागरिकाने आपत्ती काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील अनेक नागरिकांना त्वरीत मोबाईलवर ऐकू जातो.परिसरातील नागरिकांना घटना घडत असतानाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते.
ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळणे,गावातील कार्यक्रम,घटना विनाविलंब नागरीकांना एकाच वेळी कळणे, अफवांना आळा घालणे, प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणे, पोलीस यंत्रणेस कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळणे असे फायदे असल्याचे सांगून  गावासाठी यंत्रणा सुरु करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पध्दत समजावून सांगितले. या प्रात्यक्षिकास उपस्थितानी प्रतिसाद दिला.याप्रसंगी पोलिस उपविभागीय आधिकारी सई भोरे पाटील यानीही  मार्गदर्शन केले.
  
        
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार सपोनि जगदीश राऊत यानी मानले तर  सुञसंचालन भैरवनाथ कानडे यानी केले.   यावेळी  ग्राम सुरक्षा यंत्रणा विधायक अधिकारी उत्तम सुतार, पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक  टी .आर. तायवडे, पोलीस उपनिरीक्षक एम . एम शाहा , जिविशाचे धनाजी वाघमारे , अच्युत पोतदार आदिसह परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.   कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नळदुर्ग  पोलीसांनी परिश्रम घेतले.
 
Top