काटी , दि . १२ :
उस्मानाबाद जिल्हा बॕकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल आणि तुळजाभवानी साखर कारखाना सुरु केल्याबद्दल तुळजापूर तालुक्यातील राष्ट्रवादी जि . प. काटी गटाच्या वतीने २० फूटाचा पुष्पहार घालून सुनील चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
मागील अनेक वर्षांपासून बंद असलेला तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्याची अस्मिता होता .आणि या कारखान्यांच्या बंद अवस्थेमुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य निर्माण झाले होते व शेतकऱ्यांनी ऊस पिकाकडे पाठ फिरवत ऊस शेतीला रामराम ठोकला. हे शेतकऱ्यांचे हाल माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे चिरंजीव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव सुनिल चव्हाण यानी शेतकऱ्यांच्या हितासाठी नळदुर्ग येथिल तुळजाभवानी साखर कारखाना पुन्हा सुरू केला.
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल एम.व्ही.टेक इंजिनिअरिंग वर्क, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जि . प. काटी गट यांच्या वतीने 20 फूटाचा पुष्पहार घालून सुनील चव्हाण यांचा सत्कार तुळजाभवानी साखर कारखान्यात करण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे मोहन जाधव , प्रा.जुबेर शेख , सरपंच परिषदेचे जिल्हा अध्यक्ष सुजित हंगरकर, माजी सरपंच शामराव आगलावे, माजी .ग्रामपंचायत सदस्य करीम बेग,चंद्रकांत काटे,भैरीनाथ काळे, भैरू कदम, महादेव जाधव, हमीद शेख ,आणासाहेब आलुरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सुनील चव्हाण यांच्याशी विविध विषयावरती चर्चा झाली. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा ऊस जोपर्यंत जाणार नाही, तोपर्यंत हा कारखाना सुरू ठेवू असे अभिवचन तालुक्यातील शेतकरी बांधवांना सुनिल चव्हाण यानी दिले.