नळदुर्ग,  दि. २७

 महामार्गावरील  नळदुर्ग येथे बायपास रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून रेंगाळत पडले आहे, त्यांचा परिणाम सतत आपघात होवुन वारंवार वाहतुकीची कोंडी होत असल्याने प्रवाशी व वाहनचालकात असंतोष खदखदत आहे.


 अवजड माल वाहतुक करणारे वाहने नळदुर्ग  शहरातून जात आहेत, या वाहनामुळे वाहतुकीची कोंडी तर होतेच परंतु अपघाताचे प्रमाण ही दिवसेंदिवस  वाढत चालले आहे,अशाच एका अवजड वाहनामुळे एक अपघात झाला असून त्यात एका तरुणाचा नाहक जीव गेला आहे,या वाहनात तांत्रिक बिघाड झाल्याने अपघात झाला,म्हणजे हे वाहन अनफिट होते,यास वाहतुकीची परवानगी कोणी दिली?त्याचबरोबर बायपासचे काम रखडल्याने असे अपघात होत असताना टोल वसूली मात्र जोरात सुरु आहे,सामान्य माणसाच्या खिश्यावर दिवसा ढवळ्या दरोडा टाकन्याचे काम होत आहेच पण अपघात होऊन जीव ही जात आहे.

या टोल वसूलीसाठी  राष्ट्रीय महामार्ग विभाग टोल कंपनीस व ठेकेदारास पाठीशी घालत आहेत,म्हणूनच या अपघातास जबाबदार असलेल्या संबंधितावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नळदुर्ग  सहाय्यक पोलिस निरीक्षक    यांना दिलेल्या निवेदनात केली आहे,

या निवेदनावर जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोडके,शहर संघटक रवि राठोड यांच्या स्वाक्ष-या आहेत.


नळदुर्ग येथे गुरुवारी झालेल्या आपघातानंतर मनसे कार्यकर्त्यांनी  महामार्गचे  कार्यकारी अभियंता   सुहास चिटणीस  यांच्याशी फोनवर संपर्क साधुन यांचा जाब विचरला असता लवकरच बायपास रोडच्या कामाला सुरुवात होईल असे सांगितल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी  बोलताना म्हटले.

 
Top