प्रतिकात्मक फोटो
सोलापूर हैद्राबाद हा महामार्ग उस्मानाबाद जिल्ह्यातुन गेलेला असुन अणदुर , नळदुर्ग , जळकोट,आष्टा मोड, आदीसह जागोजागी रस्त्याचे काम अनेक वर्षापासुन रखडत पडल्याने या महार्गावर वारंवार आपघात होवुन नाहकच अनेकाना जीव गमवावा लागत असल्याचे सर्वश्रुत आहे.
नळदुर्ग शहर व परिसरात हा महामार्ग साक्षात मृत्युचा सापळा बनला असुन आणखीन किती निष्पाप जीव घेणार असा प्रश्न नागरिकातुन उपस्थित केला जात आहे. या महामार्गाचे काम अर्धवट असताना घाई घाईने टोलनाका सुरू करून कुणाच्या तुंबड्या भरल्या जात आहेत. याबाबत वाहन चालकातुन संशय व्यक्त केले जात आहे. फुलवाडी ता.तुळजापूर येथिलटोल नाक्यावरील टोल वसुली बंद करावी, अपुर्ण रस्त्याचे कामे पुर्ण करण्याच्या मागणीसाठी यापुर्वी वेळोवेळी आंदोलन झाले आहे.
या टोल की झोल प्रकरणी उस्मानाबाद जिल्ह्याचे
पालकमंत्री, खासदार, आमदार या गंभीर बाबींकडे लक्ष देणार आहेत की नाही ? असा सवाल जनतेतुन चर्चिला जात आहे.
महामार्गाचे अपुर्ण काम व टोल वसुली मुद्द्यावर जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी गप्प
रखडत पडलेल्या माहामार्गाचे काम पुर्ण करुन मगच वाहन चालकाकडुन टोल घेण्याची मागणी सतत होत असताना प्रशासन उदासीनतेची भुमिका घेत असल्याचे दिसुन येत आहे. तर लोकप्रतिनिधी गप्प असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे टोलवसुली संदर्भात या गप्प बसलेल्या लोकप्रतिनिधींची नेमकी भूमिका काय? याबाबत नागरिकात उलट सुलट चर्चा रंगत आहे.