वागदरी ,दि. ०२ : एस.कै.गायकवाड :


 तुळजापूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेल्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या ठिकाणी त्यांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्याच्या कामास व तसेच पुतळा परिसराच्या शुशोभीकरण करण्याच्या कामास त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात सुशोभीकरण व विद्दुतीकरण करण्याच्या कामास तात्काळ सुरूवात करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले)च्या वतीने  उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्याकडे  निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


   उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्याकडे रिपाईच्या वतीने जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओहाळ, जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली  देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुळजापूर येथे  डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात  त्यांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्याच्या व पुतळा परिसराच्या सुशोभीकरण करण्याच्या कामाला शासनाने सर्वोतोपरी मंजुरी दिलेली आहे. तरी  सदर काम तात्काळ सुरू करावे. तसेच येथील  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात  सुशोभीकरण व विद्दुतीकरण त्वरित करावे अन्यथा रिपाइंच्या वतीने या संदर्भात तीव्र आंदोलन करण्याचा  इशाराही  निवेदनाद्वारे दिला आहे.

  
 निवेदनावर रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओहाळ, जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम,जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, रिपाइं तुळजापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब मस्के,तुळजापूर विधानसभा अध्यक्ष प्रकाश कदम,शहराध्यक्ष अरूण कदम,युवा शहराध्यक्ष अमोल कदम आदीसह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
 
Top