नळदुर्ग ,दि.७
एस.बी.आय फाउंडेशन,मुंबई व दिलासा जनविकास प्रतिष्ठान औरंगाबाद यांच्या समन्वयातून ग्रामसेवा कार्यक्रमांतर्गत 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गायरान तांडा येथे जिल्हा परिषद शाळेच्या आवारात फळे, फुले, वनीकरणाची झाडे लावण्यात आली आहे.
यावेळी येडोळाचे सरपंच पद्माकर पाटील, उपसरपंच लक्ष्मी जाधव, राजेंद्र जाधव, दिलासाचे प्रकल्प व्यवस्थापक विलास राठोड, भूषण पवार, गुरुदेव राठोड, अमोल पवार, अजित पवार, अविनाश पवार, सचिन पवार, राजकुमार राठोड, विठ्ठल जाधव, उमेश पवार शाळेतील लहान चिमुकली मुले व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.