तुळजापूर, दि. ८
तुळजापूर तालुक्यात मागील 27 दिवसापासून सलग पाऊस पडत असल्यामुळे सोयाबीनचे पीक बहुतांशी वाया गेले आहे आणि घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. याची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा उस्मानाबाद कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी तुळजापूर तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर उभे राहून नुकसानीची पाहणी केली.
सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शिवसेना सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिली आहे. त्यामुळे शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून आपण तुळजापूर तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पाहणी करीत आहोत. इतर आमदार मोबाईल वरून माहिती घेत आहेत. त्यामुळे या नुकसानीच्या काळात देखील शिवसेना शेतकऱ्याला मदत मिळेपर्यंत संघर्ष करणार आहे असा विश्वास जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांनी तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिला.
तुळजापूर तालुक्यातील झालेली अतिवृष्टी व घरांची झालेली पडझड पाहणीसाठी आमदार कैलास पाटील यांनी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी, पिंपळा, देवकुरुळी कुंभारी, धनेगाव, राखेल या गावाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी जिल्हा उपप्रमुख श्याम पवार, तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी ॲड गजानन चौगुले, सुनील जाधव, मुकुंद गायकवाड, अमोल घोटकर, कृष्णा घोटकर, सुधीर कदम, चेतन बछगर. बाळासाहेब शिंदे. सौदागर जाधव, श्याम पाटील ,वीरेश डोंगरे, मनोज डोंगरे ,तुकाराम डोंगरे ,आनंद दुलंगे ,आप्पा डोंगरे ,दीपक खोपडे, दत्तात्रय तांबे, नाना कोळी, सरपंच उपसरपंच तसेच तहसीलदार सौदागर तांदळे , कृषी अधिकारी जाधव , मंडळ अधिकारी, ग्रामसेवक तलाठी आदी उपस्थित होते.
या निमित्ताने शिवसेनेच्या स्थानिक नेत्याकडून तुळजापूर तालुक्यात झालेल्या मोठ्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कैलास पाटील आवर्जून उपस्थित राहिले मात्र तुळजापूरचे आमदार मात्र केवळ मोबाईलवर संपर्क साधून आहेत अशी उपवासात्मक टीका करण्यात आली. शिवसेनेचे आमदार आणि शिवसेना पक्ष नेहमी जनतेच्या सोबत राहिला आहे आणि कायम राहणार आहे अशी ग्वाही या निमित्ताने जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील यांनी तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना बोलताना दिली. या सरकारला नुकसान भरपाई दिल्याशिवाय गप्प बसू देणार नाही .आपण मुख्यमंत्री महोदयांना या संदर्भात माहिती देऊ आणि मदत करण्यासाठी भाग पाडू असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला.