काटी ,/ तुळजापूर, दि. १९: उमाजी गायकवाड , डाँ सतिश महामुनी
तुळजापूर तालुक्यातील कसई, भातंब्री, मंगरुळ गावात अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणावर पिकांचे नुकसान झाले. या झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी, नाले तुडुंब भरले असून सोयाबीन,उडीद, भाजीपाला सारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतातील उभी पिके अक्षरशः पाण्यात असून या भागातील नुकसानग्रस्त शेतकरी मेटाकुटीला आला आले. शुक्रवार दि.19 रोजी सकाळी 11:30 वाजता उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कसई येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करुन उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना
पिक विमा काढला का? याबाबत संबंधित शेतकऱ्यांना विचारणा केली.
यावेळी तहसीलदार,कृषी अधिकारी, तलाठ्याने झालेल्या पिक नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी तात्काळ पंचनामे करून शासनाकडे तात्काळ अहवाल सादर करण्याचे सुचना देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी या संकटाने खचून न जाता धिराने सामना करण्याचे आवाहन केले. तसेच नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले.
यावेळी भाजपचे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या समवेत भाजपचे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे, तहसीलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी प्रशांत सिंह मरोड, तालुका कृषी अधिकारी जाधव, सरपंच बोधला गायकवाड, ग्रामसेवक पारधे, तलाठी श्रीमती कुलकर्णी, कृषी सहाय्यक श्रीमती धनके, सुरेश पाटील, दशरथ जाधव, प्रकाश हिप्परकर, धनंजय साखरे, व्यंकट म्हमाणे, बाबासाहेब गुरव, तानाजी पाटील, रमेश कामटे, रवि कुलकर्णी, यतीन मेहता, महेंद्र सुरवसे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.