काटी, दि.३०

तुळजापूर तालुक्यातील पिंपळा बु., काटगाव या गावात  माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी धावती भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधत विविध विषयांवर चर्चा करून अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, विजेचा लपंडाव, रस्त्याची दयनीय अवस्था, कर्ज पुरवठ्यामधील अडचणी, शासनाकडून न मिळणारी मदत आदी समस्यांवर ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली. 


यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे माजी सभापती पंडित जोकार, पं. स.माजी  सदस्य रामदास चेंडके, महादेव पाटील, दिनकर गिराम, सिद्धेश्वर कस्तुरे, लालसाहेब वांगेवाले,भीमराव गायकवाड,आप्पा पाटील,नाना पवार, आप्पासाहेब महाजन, मनमत हजारे, तर पिंपळा बुद्रुक येथे माजी सरपंच बलभीम चौगुले, पोलीस पाटील धैर्यशील राजे पांढरे, तंटामुक्ती अध्यक्ष सिताराम पाटील, बालाजी चुंगे, उपसरपंच विजय जाधव, सुभाष शिंदे, संग्राम राजे पांढरे, सोमनाथ मोरे, परवेज शेख, बालाजी खराबे, आप्पा गवळी, मंगेश जाधव, उत्तम नरवडे, पांडुरंग पाटील, गणेश चौगुले, विश्वनाथ खराबे,मारुती निहार, सुधाकर वाघमोडे सरपंच, भारत धोतरकर, गोपाळ जाधव, बाळू शिरसाट,शंकर चौगुले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी कोणताही लोकप्रतिनिधी ग्रामीण भागाकडे लक्ष देत नसल्याची खंत ग्रामस्थांनी बोलून दाखवली. यावेळी कोणत्याही संकटात मदत करण्याचे आश्वासन मधुकरराव चव्हाण यांनी ग्रामस्थांना दिले.
 
Top