मुरुम, ता. उमरगा, दि. ७ :
येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२२-२३ साठीचा रोलर पुजनाचा कार्यक्रम कारखान्याचे चेअरमन तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते रविवारी (दि. ७) रोजी संपन्न झाला.
यंदाच्या हंगामात कारखान्याचे ६ लाख मेट्रीक टन ऊसाच्या गाळपाचे उद्दिष्टे असून यंदाच्या हंगामासाठी लागणारी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा, मशिनरी ओव्हरहॉलींग, दुरुस्तीची कामे युध्द पातळीवर चालु आहेत. अनेक अडथळ्यावर मात करत कारखान्याची यशस्वी वाटचाल चालु असून येणारा गळीत हंगाम योग्य व नियोजनबध्द पध्दतीने सर्व संचालक मंडळ व आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास कारखान्याचे चेअरमन बसवराज पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापुराव पाटील, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन सादिकमियाँ काझी, विजयकुमार सोनवणे, माजी साखर आयुक्त डी. आय. गायकवाड, कारखान्याचे संचालक शरणप्पा पत्रिके, केशव पवार, विठ्ठलराव पाटील, दिलीप भालेराव, शिवलिंग माळी, माणिकराव राठोड, संगमेश्वर घाळे, उमरगा पंचायत समिती माजी सभापती मदन पाटील, नानाराव भोसले, विकास हराळकर, देवेंद्र कंटेकूरे, युसूफ मुल्ला, माजी नगराध्यक्ष प्रदिप दिंडेगावे, बबनराव बनसोडे, गोविंद पाटील, दत्ता चटगे, प्रमोद कुलकर्णी, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. बी. अथणी, चिफ इंजिनियर ए. एल. अष्टेकर, चिफ केमीस्ट एस. बी. गायकवाड, मुख्य शेतकी अधिकारी ए. बी. राखेलकर, कार्यालयीन अधिक्षक के. एम. चौगुले, सर्व अधिकारी, कामगार, कर्मचारी उपस्थित होते.