नळदुर्ग ,दि. ०८:

:विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवराना समिक्षा जिवन गौरव पुरस्काराने सन्मानित करणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून शालेय साहित्याचे वाटप करणे आदी समिक्षा फाउंडेशनचे कार्य समाजाला प्रेरणादायी आसल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शरण बसवराज पाटील यांनी आष्टा (कासार) ता.लोहार येथे बोलताना केले.
   


समिक्षा फाउंडेशन, लुबिंनी  बुद्ध विहार ट्रस्ट व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आष्टा (कासार) ता.लोहारा यांच्यावतीने दिवंगत तुकाराम गायकवाड यांच्या स्मृती प्रित्यर्थ आष्टा (कासार) येथे समिक्षा जीवन गौरव पुरस्कार वितरण, इ.१०वी , १२ वी बोर्ड परिक्षा उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 


याप्रसंगी शरण पाटील बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून उपेक्षित बहुजनांना मानवी हक्क मिळवून दिले. शिका! संघटीत व्हा! संघर्ष करा ! असा मूलमंत्र दिला तेंव्हा विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श समोर ठेवून आपली सर्वांगीन प्रगती साधण्याचा प्रयत्न करावा.
  प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करुन शैक्षणिक  व साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे माजी प्राचार्य डॉ. व्ही.एल.एरंडे, सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे साखर संकुलनाचे माजी उपसंचालक दत्तात्रय गायकवाड तर सामाजिक व पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे एस.के.गायकवाड (वागदरी ता.तुळजापूर) आदी मान्यवराना राष्ट्रीय युवक कांग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील यांच्या हस्ते महात्मा फुले पुणेरी पगडी, स्मृती चिन्ह, व संविधानाची प्रास्ताविका देऊन समिक्षा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच शरण पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.तसेच याप्रसंगी डॉ.प्रा.म.ना.गायकवाड यांचा सेवा निवृत्तीबद्दल तर सोनकांबळे  याना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल  सत्कार करण्यात आला. 
 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सूलभा कांबळे  तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प.सदस्य  दिलीप भालेराव, प्रा.राजाभाऊ सोनकांबळे, उपसरपंच वसंत सुलतानपूरे आदी उपस्थित होते.
  

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  डॉ. डी.टी.गायकवाड यांनी  तर सूत्रसंचलन डॉ. प्रा.संतोष पवार यांनी केले. यावेळी अँड. सयाजी शिंदे, जि.प.सदस्य रफिक तांबोळी, बाबुराव कांबळे, आर. जी. गायकवाड, आर.एन.सोनकांबळे, सदाशिव कांबळे, आदीनाथ कांबळे, बाळू कांबळे, रोहित गायकवाड, स्वप्नील सोनवणे, रितेश गायकवाड, बलभीम गायकवाड आदी उपस्थित होते.
 
Top