तुळजापूर ,दि. १०

तुळजापूर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन उस्मानाबादच्या शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे यांच्या हस्ते सैनिक विद्यालय तुळजापूर येथे झाले.

 याप्रसंगी गटविकास अधिकारी प्रशांत सिंह मरोड ,गटशिक्षणाधिकारी श्रीम. मेहरुन्नीसा इनामदार , विस्तार अधिकारी अर्जुन जाधव , मल्हारी माने , डॉ . यशवंत चव्हाण ,मल्लीनाथ काळे ,शोभा राऊत , तात्या माळी , दैवशाला शिंदे , प्राचार्य घोडके या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले .तालुक्यातील प्रत्येक बीटमधील विजयी संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला आहे .


शालेय वयात खेळ - व्यायाम यास विशेष महत्त्व असून शारीरिक विकास व वाढीसाठी हा काळ महत्त्वाचा मानला जातो . शिवाय कोरोना काळात मुले ही खेळ व मैदानापासून दूर होती . पुन्हा त्यांना खेळ व मैदानाची गोडी लावणे गरजेचे होते . या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभर क्रीडाविषयक वातावरण तयार झाले आहे .त्या दृष्टीने स्पर्धेत आपले कौशल्य दाखवण्यासाठी सर्व खेळाडू उत्सुक असलेले दिसून आले . सांघिक खेळामुळे संघ भावना वाढीस लागते . मुलांची यातून खिलाडू वृत्ती विकसित होते व त्यातून निकोप स्पर्धा निर्माण होते . संघभावना वाढीस लागते आणि मुलांच्या सामाजिक विकासासाठी ही स्पर्धा महत्त्वाची भूमिका बजावते . याच उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन होत आहे .


    क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी श्रीमती साळुंखे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या .विजय व पराभव हे जीवनाचे अविभाज्य भाग असून जिंकण्यातील आनंद भविष्याची ऊर्जा ठरतो . पराभव झालेल्या खेळाडूचा  व खेळातील कौशल्याचा आदर करायला शिका .पराभव हा जिंकण्याची प्रेरणा देतो म्हणून पराभवाने खचून जाऊ नका अशी असे सांगताना प्रत्येक जण जिंकण्यासाठीच मैदानात उतरलेला असतो . प्रत्येकाने जिद्द कायम ठेवावी . तिच तुम्हाला यशापर्यत पोहोचवते असे सांगितले .

    या स्पर्धेत खो-खो , व्हॉलीबॉल , योगासन , कबड्डी , थ्रोबॉल , कुस्ती व सर्व मैदानी  प्रकार या खेळाचा समावेश असून या स्पर्धा १४ वर्षे व १७ वर्षे वयोगटात खेळल्या जात आहेत . सर्व क्रीडा प्रकारात खेळाडूंनी कौशल्यपणास लावले . सर्वांचाच यात उत्साहवर्धक सहभाग होता . संपूर्ण तालुक्यात १००० मुले - मुली खेळाडूंचा विविध क्रीडा प्रकारातून आपले कौशल्य अजमावत आहेत.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री . विठ्ठल नरवडे यांनी केले .ही स्पर्धी यशस्वी होण्यासाठी  विष्णू दळवी , राजेश बिलकुले , संजय सोलनकर , सतिश हुंडेकरी , तुकाराम क्षीरसागर , ऋषी भोसले , विठ्ठल नरवडे ,रामकृष्ण खडके , नितीन ढगे , विजय माने , बालाजी पाठक , सुनिल पांचाळ , शिवदास भागवत , रेवणसिद्ध आंधळकर , करीम शेख , पवन सूर्यवंशी , अनंतकुमार डुरे , राजू गायकवाड , देविदास गायकवाड , प्रशांत काळे , प्रसाद डांगे , हे यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत .
 
Top