बहिणाबाई चौधरी राज्यस्तरीय पुरस्कार  माजी मंत्री मधुकरराव चव्हण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान 


नळदुर्ग,दि.२६: एस.के.गायकवाड

महाराष्ट्र ही पुरोगामी विचार मांडणारी थोर संताची व महापुरुषांची भुमी आहे. या भुमीत अनेक संत होऊन गेले. थोर कवियत्री बहिणाबाई चौधरी यांनी "आधी हाताला चटके मग मिळते भाकर" कष्ट घेतल्याशिवाय फळ मिळत नाही, अशा अशयाच्या अनेक ओव्या लिहून समाज प्रबोधन केले. त्यांच्या नावाने जात्यावर ओव्या गाणाऱ्या  महिलांना राज्य स्तरीय पुरस्काराने सन्मानित केल्याने त्यांना प्रेरणा मिळते, नविन पढी घडविण्यासाठी आशा कार्यक्रमाची गरज  असल्याचे  मत  माजी  मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी इटकळ ता.तुळजापूर येथे  व्यक्त केले.
 

शहरापासून ते गाव खेड्या पर्यंतच्या महिलाना संत तुकाराम सामाजिक संस्था बाभळगाव ता.तुळजापूर व ग्लोबल व्हिलेज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बोरामणी जि. सोलापूर यांच्या वतीने जात्यावर ओव्या गाणाऱ्या १५ महिलांना कवियत्री बहिणाबाई चौधरी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मधुकरराव चव्हाण हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
   
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कवियत्री कांताबाई शिंदे संभाजीनगर , सुलाबाई सरवदे येवती , पद्मावती रेवगे अणदूर , उषा देशमुख धाराशिव , कमलाबाई घुगे अणदूर , सुशिलाबाई हुकीरे केशेगाव ,अंबुबाई कसबे येवती , अनुराधा उपासे मंगरूळ , गवळण बांगर बांगरवाडी , सिमा वाघमारे येवती ,मुक्ताबाई सारणे चिवरी , सुमित्रा घुगे अणदूर , कस्तुराबाई देडे सांगवी (बु,)अनधा ओवरीकर तुळजापूर , भिवराबाई थोरात नळदुर्ग ,आदीं  महिलाचा आधुनिक बहिणाबाई चौधरी म्हणून त्यांना कवियत्री बहिणाबाई चौधरी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . हा कार्यक्रम कै.तुकाराम एकनाथ काळुंके यांच्या स्मरणार्थ घेण्यात आला .


यावेळी प्रमुख पाहुणे उमाकांत मिटकर सदस्य महाराष्ट्र राज्य पोलीस  प्राधिकरण न्यायक समिती मुंबई ,योगीराज माने जेष्ठ कवि विचारवंत लातूर , रामचंद्र  आलुरे सरपंच तथा शिक्षण प्रसारक मंडळ अणदूर ,
उमाकांत चनशेट्टी प्राचार्य जवाहर महाविद्यालाय अणदूर , संगमेश्वर जळकोटे सेवानिवृत्त प्राचार्य जवाहर विद्यालय अणदूर , कवियत्री कविता पुदाले - उकंडे नळदुर्ग , आस्मा नदाफ प्राचार्या ग्लोबल व्हिलेज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बोरामणी, लता कांळुके , मान्यवर उपस्थित होते  


कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद काळुंके यांनी केले  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ संतोष पवार यांनी केले.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव विलास कांळुके ,दिनेश सलगरे , पंडीत भोसले , एस के . गायकवाड ,संजय आलुरे , सचिन तोग्गी , प्रबोध कांबळे , पोलीस पाटील जावेद शेख , केशव गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.  मल्लीनाथ जळकोटे यांच्या आभार  नंतर जात्यावर ओवी गावुनच कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
 
Top