रिपाइं (आठवले) कार्यकर्तेच्यावतीने विविध मागण्याचे जिल्हाधिकारी याना निवेदन
नळदुर्ग, दि.१४ :एस.के.गायकवाड
नळदुर्ग ता.तुळजापूर येथील गावठाण जमिनीवरील अतिक्रमण नियमित करावे , गोवंश हत्याबंदी कायदाच्या नावाखाली अल्पसंख्याक मुस्लिम कुरेशी समाजातील व्यापारी बांधवार होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरुद्ध प्रतिबंधात्मक उपाय योजना करावी आदी मागण्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) धाराशिव जिल्हा शाखेच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले व जिल्हाधिकारी धाराशिव यांना लेखी निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत .
निवेदनात पुढे म्हटले आहे की, नळदुर्ग येथे गट नंबर २९ मधिल गावठाण जमिनी पैकी १ हे १३ आर इतकी जमीन हरीजन वस्ती वाढीसाठी संपादीत केलेली असून सदर जमीनीवर नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून घर करून राहत असलेल्या अतिक्रमण धारकांच्या नावे, त्यांचे अतिक्रमण नियमित करुन भोगवाटदार म्हणून ७/१२ उताऱ्यावर त्यांची नोंद घेवून त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून द्यावा, तसेच गोवंश हत्या बंदी कायदाच्या नावाखाली अल्पसंख्याक मुस्लिम कुरेशी समाजातील व्यापारी बांधवार होणाऱ्या अन्याय विरुद्ध प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात यावी आदी प्रमुख मागण्यासह विविध मागण्या त्वरित मान्य कराव्यात.
रिपाइंच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर रिपाइंचे पॅंथर तानाजी कदम, जिल्हा संपर्क प्रमुख विद्यानंद बनसोडे,जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, रणजीत गायकवाड, जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, रिपाइं युवा आघाडी चे जिल्हा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे, रिपाइं युवा आघाडीचे धाराशिव शहर कार्याध्यक्ष प्रवीण बनसोडे, रिपाइं अल्पसंख्याक आघाडीचे तुळजापूर तालुका अध्यक्ष बाशिद कुरेशी, तुळजापूर शहराध्यक्ष अरुण कदम, माजी नगरसेवक शब्बीर कुरेशी, प्रकाश बनसोडे, कार्यकर्ते नामदेव बनसोडे आदीसह रिपाइंच्या कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.