नळदुर्ग : भाजपच्या "संकल्प ते सिद्धी" अभियानांतर्गत आयोजित  जनता दरबारात ४० तक्रारी प्राप्त 

नळदुर्ग,दि.२१ :

मोदी सरकारचे 11 वर्ष पुर्ण झाल्याच्या अनुषंगाने आतापर्यंत भाजपच्या वतीने राबविलेल्या योजनेची माहिती नागरिकांना देण्यकरिता आणि नागरिकांच्या समस्याचे निवारण करण्यासाठी  "संकल्प ते सिद्धी" अभियानांतर्गत नळदुर्ग शहरातील व्यासनगर येथे शनिवार दि.२१ जुन रोजी जनता दरबार आयोजित करण्यात आले होते.
व्यासनगर येथिल  श्री विठ्ठल मंदिर येथे सकाळी 10 ते व 1 वाजेपर्यंत नागरिकांनी स्वच्छता, पिण्याचे पाणी, हुतात्मा निलय्या स्वामी उद्यानाची साफ सफाई आदीसह इतर विषयांवर असे एकुण 40 तक्रारी दाखल केली. यावेळी भाजपाच्या पदाधिका-यांनी न.प.प्रशासनास नागरिकांच्या तक्रारीची माहिती देवुन त्यावर तातडीने उपाय योजना करण्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे
  नळदुर्ग मंडळाध्यक्ष बसवराज (आप्पा) धरणे यांनी सांगितले. या कार्यक्रमातच  विठ्ठल मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी भाजपचे सुशांत भुमकर, बसवराज धरणे,उदय जगदाळे, संजय बताले,नय्यर जहागिरदार,  धिमाजी घुगे
श्रीमिक पोतदार, जिलानी कुरेशी ,अक्षय भोई, संदीप गायकवाड, सुदर्शन पुराणिक , शिवाजी व-हाडे,वैभव पाटील, निवृत्त प्राध्यापक राजीव कदम, सुनिल जांभळे, नितीन गायकवाड, बबन चौधरी, अमोल मेंढे, मुद्दसर शेख, सलीम बागवान, आदीसह भाजपचे  कार्यकर्ते, पदाधिकारी,महिला , पुरूष नागरिक उपस्थित होते.



 
Top