नळदुर्ग नगरपालिकेच्या आगामीहोणार्‍यानिवडणुकीत विद्यमान लंगोटी बहाद्दर नगरसवेकांबरोबर शहरातील काही भ्रष्टाचाराने बरबटलेले, प्रतिमा मलिन झालेले अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधुन निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करीत आहे.
‘नळदुर्ग शहर’ पोलिस डायरीत संवेदनशील शहर म्हणुन सर्वश्रूत आहे. प्रत्येक वेळी होणार्‍या निवडणुकीत हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करून लंगोटी बहाद्दर राजकारणी स्वत:च्या पोळ्या भाजून घेतात. शहरामध्ये राजकारण्याव्यतिरिक्त नागरिकांच्या मानसिकतेचा व शहरातील वॉर्ड निहाय गेल्या एक दशकापासुन निचडून गेलेले नगरपालिका सदस्यांचा इतिहास पाहता असे दिसते. सर्व धर्म, समभाव व शांतता प्रिय असे हेे नागरिक आहेत. हिंदु बहुल मतदार असलेल्या वॉर्ड मधुन चार ते पाच वार्डामधुन सतत मुस्लिम नगरसेवक निवडून येतात. तरीही प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत काही राजकारणी लोक शहरामध्ये तणाव निर्माण करून स्वत:ची पोळी भाजुन घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. सध्या तर छत्रपतीच्या वारसांना राजे म्हणताना भिती वाटते. राजकारणामध्ये प्रति शुन्य असताना निवडणुकीचे नगारे वाजु लागताच अनेकांना नगरपालिकेचा सदस्य झाल्यासारखे वाटत आहे. विद्यमान नगरसेवकांचे तर त्याहुन जग निराळेच आहे. पाच वर्षात न.पा. मध्ये केलेल्या कामाचा व शहरात केलेल्या विकास कामाचा, समाजसेवेचा एकानेही लेखाजोखा जाहिर केला नाही. गेल्या पाच वर्षात २५ कोटीचे कामे करण्यात आली. मात्र कामाचा दर्जा कोणीही विचारू नये, अशा प्रकाराचा करण्यात आला. जागा नसताना घरकुले मंजूर करून ठेकेदाराकडून हजारो रूपये लाटले. सध्या घरकुल योजना पूर्ण होईल की नाही, या द्विधा अवस्थेत घरकुल योजना आहे. सर्वत्र अतिक्रमणे वाढले असताना घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. आजघडीला पाचशेच्या जवळपास घरे बांधुन तयार आहेत. परंतु अनेक घरकुल वाटप होण्यापूर्वी पावसात गळती लागली आहे. तर अनेक ठिकाणी तडे गेले आहे, अशा बिकट अवस्थेत ही योजना रखडली आहे. याविषयी एकाही नगरसेवकाने तोंड उघडले नाही. त्याबद्दल शहरवासियांतुन आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
विद्यमान नगरसेवकांनी जनतेची दिशाभूल केल्याची शहरवासियांची तक्रार आहे. ‘मांजर डोळे मिटुन दुध पिते, तिचा असा गैरसमज असतो की, तिच्याकडेे कोणी पाहत नाही. परंतु सवार्र्ंच्या नजरा मांजराकडे असतात’. तसाच प्रकार नगरसेवकांच्या बाबतीत घडत आहे. विद्यमान नगरसेवकांपैकी काहीजण सुशिक्षित असून बाकी अल्प शिक्षित आहेत. या नगरसेवकांना न.पा. प्रशासनाच्या कायद्याचे ज्ञान नसल्याने सर्वत्र भ्रष्टाचार बोकळला आहे. येणार्‍या निवडणुकीतही विविध राजकीय पक्षाकडून निवडणुकीचे तिकीट मागण्यासाठी असेच अशिक्षीत, अल्प शिक्षित, दारूडे, जुगारी व पोलिसांत गुन्हा दाखल असलेले गुन्हेगार निवडणुकीचे तिकीट मागण्याकरिता पक्ष नेतृत्वाकडे ङ्गिल्डींग लावत आहेत. अशा या लंगोटी बहाद्दर राजकारण्यांना राजकीय पक्ष नेतृत्वाने दूर ठेवून शहर विकासासाठी व नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने काम करणार्‍या शिक्षित उमेदवारांनाच प्राधान्य देण्याची मागणी जनतेतुन होत आहे.

 
Top