उस्मानाबाद :- पाणी टंचाई परिस्थितीचा सामना करण्यासाठी पक्ष मतभेद विसरुन या संकट प्रसंगी गावातील नागरिकांनी एकत्र येऊन पिण्याचे पाणी, नादुरुस्त नळयोजना दुरुस्त करणे, पाण्याची गळती थांबविणे, गावातील बोर दुरुस्त करणे, रिबोर करुन घेणे आणि विंधन विहीरींची कामे तातडीने करणे अशा प्रश्नावर गावात ग्रामसभा घेऊन गावातील टंचाई संदर्भातील कामाचा तात्काळ आराखडा तयार करावा, असे प्रतिपादन पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पालकमंत्री चव्हाण यांनी या तालुकानिहाय बैठका घेत जात आहेत. आज त्यांनी पाणीटंचाई व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना संदर्भात आज त्यांनी कळंब आणि वाशी येथे दुष्काळी आढावा बैठक घेतली. त्यावेळी कळंब येथे बोलतांना वरील प्रतिपादन केले. या बैठकीस खासदार डॉ. पदमसिंह पाटील, आमदार ओमराजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, समाज कल्याण सभापती दगडू धावारे, कृषी सभापती पंडीत जोकार, महिला व बाल कल्याण सभापती सविता कोरे, पंचायत समिती सभापती श्रीमती छाया वाघमारे व उपसभापती श्री.आडसूळ, नगराध्यक्ष शिवाजी कापसे, भागवत धस, यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत हजारे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एन.तागडे,तहसीलदार डी.एच.राठोड, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, आदिंसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.
कळंब तालुक्यातील साठवण व पाझर तलावाचे सर्व्हे करून त्यातील विहिरींचे गाळ काढण्यासाठी खोदकाम सुरु करावे. तलावामध्ये मुरलेले पाणी आपल्याला मिळाले तर पाण्याचा प्रश्न सोडवून टंचाईवर मात करता येऊ शकेल. तसेच भारत निर्माण, राष्ट्रीय पेयजल, तात्पूत्या नळ योजनांचं प्रस्ताव सादर करुन त्याला तात्काळ मंजूरी घ्यावी, असे सांगून ते पुढे म्हणाले की, पाण्याचा प्रश्न यावरही सुटत नसेल तर विहिर व बोअरचे अधिग्रहण करुन मागणी प्रमाणे टँकरही उपलब्ध करुन देण्यात येतील. नगरपालिकेने चालू थकबाकी भरुन तात्काळ नळ कनेक्शन द्यावेत,अशा सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
ग्रामपंचायतीमार्फत विविध विकास कामाबरोबर रस्ते, शेततळे, साठवण तलाव व विहिरीच्या कामाची मागणी करावी. त्यांची मागणी येताच रोजगार हमी योजनेची कामे त्यांना उपलब्ध करुन द्यावीत. यासाठी शासनाकडून निधी कमी पडणार नाही. जनावरांच्या पिण्याच्या प्रश्नाबाबत तयार सिमेंटचे हौद खरेदी करणे, जनावरांच्या चाऱ्यांसाठी छावण्या उभारण्याचे कामही मागणीप्रमाणे स्वयंसेवी संस्थांना तात्काळ उपलब्ध करुन दिले जाईल. तालुक्यात विंधन विहिरींचे कामे सुरु आहेत ते पूर्णत्वाकडे नेहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा.
डॉ.खासदार पाटील यावेळी म्हणाले की, यावर्षी पाऊस कमी पडल्याने टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करावा,असे सांगून ते पुढे म्हणाले की, बारमाही शेतीही ठिंबक सिंचनाद्वारे करावी म्हणजे पाण्याची बचत होईल. पिण्याचे पाणी व जनावरांसाठी छावण्या उभारण्याबाबत त्यांनी स्वयंसेवी संस्थाना आवाहन केले.
आमदार निंबाळकर यांनी सांगितले की, टंचाईला सामोरे जाण्यासाठी सर्वांनी मानसिकता बदलण्याची वेळ आहे. पाण्याचा कमीत कमी वापर करावा. पाणी बचत करावी पुढील काळात हे पाणी कसे जपून वापरता येईल यासाठी प्रत्येकाने वैयक्तीक सहभाग घेणे गरजेचे आहे, असेही सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी प्रास्ताविकात पाण्याची भूगर्भातील पातळी खोलवर गेली आहे. यासाठी पाण्याचा उपसा नियंत्रित करण्याची वेळ आता आली आहे. पाणी पातळी उंचाविण्यासाठी खोलवरील जूने पाणी बोअरद्वारे काढून घेऊ नका. पाण्याचा काटकसरीने वापर करा. गाव पातळीवर पाण्याचे नियोजन करावे. शेवटचा पर्याय म्हणून पाण्यासाठी टँकरचा वापर करावा. अशा परिस्थितीत प्रत्येकाने पुढाकार घेऊन योगदान देण्याची वेळ आली आहे,असे त्यांनी सांगितले
प्रांरभी पालकमंत्री चव्हाण यांनी सर्व पदाधिकारी, सरपंच, ग्रामसेवक यांनी मांडलेल्या प्रश्नांबाबत वसतूसिथती जाणून घेतली.ज्यांच्या अडी-अडीचणी असतील त्यांनी लेखी स्वरुपात सादर कराव्यात त्या प्रश्नाचे तात्काळ निराकरण करण्यात येईल, अशी माहिती बैठकीत दिली.
यावेळी डॉ. पद्मसिंह पाटील आणि आमदार ओमराजे निंबाळकर यांनी आपले विचार मांडले. या आढावा बैठकीस जि.प.सदस्य, संबंधित सभापती, पंचायत समिती सदस्य, तालुकास्तीय अधिकारी, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, नरेगा कर्मचारी, नगर पालिका कर्मचारी पत्रकार आदी मोठया संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पालकमंत्री चव्हाण यांनी या तालुकानिहाय बैठका घेत जात आहेत. आज त्यांनी पाणीटंचाई व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना संदर्भात आज त्यांनी कळंब आणि वाशी येथे दुष्काळी आढावा बैठक घेतली. त्यावेळी कळंब येथे बोलतांना वरील प्रतिपादन केले. या बैठकीस खासदार डॉ. पदमसिंह पाटील, आमदार ओमराजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, समाज कल्याण सभापती दगडू धावारे, कृषी सभापती पंडीत जोकार, महिला व बाल कल्याण सभापती सविता कोरे, पंचायत समिती सभापती श्रीमती छाया वाघमारे व उपसभापती श्री.आडसूळ, नगराध्यक्ष शिवाजी कापसे, भागवत धस, यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत हजारे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एन.तागडे,तहसीलदार डी.एच.राठोड, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, आदिंसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.
कळंब तालुक्यातील साठवण व पाझर तलावाचे सर्व्हे करून त्यातील विहिरींचे गाळ काढण्यासाठी खोदकाम सुरु करावे. तलावामध्ये मुरलेले पाणी आपल्याला मिळाले तर पाण्याचा प्रश्न सोडवून टंचाईवर मात करता येऊ शकेल. तसेच भारत निर्माण, राष्ट्रीय पेयजल, तात्पूत्या नळ योजनांचं प्रस्ताव सादर करुन त्याला तात्काळ मंजूरी घ्यावी, असे सांगून ते पुढे म्हणाले की, पाण्याचा प्रश्न यावरही सुटत नसेल तर विहिर व बोअरचे अधिग्रहण करुन मागणी प्रमाणे टँकरही उपलब्ध करुन देण्यात येतील. नगरपालिकेने चालू थकबाकी भरुन तात्काळ नळ कनेक्शन द्यावेत,अशा सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
ग्रामपंचायतीमार्फत विविध विकास कामाबरोबर रस्ते, शेततळे, साठवण तलाव व विहिरीच्या कामाची मागणी करावी. त्यांची मागणी येताच रोजगार हमी योजनेची कामे त्यांना उपलब्ध करुन द्यावीत. यासाठी शासनाकडून निधी कमी पडणार नाही. जनावरांच्या पिण्याच्या प्रश्नाबाबत तयार सिमेंटचे हौद खरेदी करणे, जनावरांच्या चाऱ्यांसाठी छावण्या उभारण्याचे कामही मागणीप्रमाणे स्वयंसेवी संस्थांना तात्काळ उपलब्ध करुन दिले जाईल. तालुक्यात विंधन विहिरींचे कामे सुरु आहेत ते पूर्णत्वाकडे नेहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा.
डॉ.खासदार पाटील यावेळी म्हणाले की, यावर्षी पाऊस कमी पडल्याने टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करावा,असे सांगून ते पुढे म्हणाले की, बारमाही शेतीही ठिंबक सिंचनाद्वारे करावी म्हणजे पाण्याची बचत होईल. पिण्याचे पाणी व जनावरांसाठी छावण्या उभारण्याबाबत त्यांनी स्वयंसेवी संस्थाना आवाहन केले.
आमदार निंबाळकर यांनी सांगितले की, टंचाईला सामोरे जाण्यासाठी सर्वांनी मानसिकता बदलण्याची वेळ आहे. पाण्याचा कमीत कमी वापर करावा. पाणी बचत करावी पुढील काळात हे पाणी कसे जपून वापरता येईल यासाठी प्रत्येकाने वैयक्तीक सहभाग घेणे गरजेचे आहे, असेही सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी प्रास्ताविकात पाण्याची भूगर्भातील पातळी खोलवर गेली आहे. यासाठी पाण्याचा उपसा नियंत्रित करण्याची वेळ आता आली आहे. पाणी पातळी उंचाविण्यासाठी खोलवरील जूने पाणी बोअरद्वारे काढून घेऊ नका. पाण्याचा काटकसरीने वापर करा. गाव पातळीवर पाण्याचे नियोजन करावे. शेवटचा पर्याय म्हणून पाण्यासाठी टँकरचा वापर करावा. अशा परिस्थितीत प्रत्येकाने पुढाकार घेऊन योगदान देण्याची वेळ आली आहे,असे त्यांनी सांगितले
प्रांरभी पालकमंत्री चव्हाण यांनी सर्व पदाधिकारी, सरपंच, ग्रामसेवक यांनी मांडलेल्या प्रश्नांबाबत वसतूसिथती जाणून घेतली.ज्यांच्या अडी-अडीचणी असतील त्यांनी लेखी स्वरुपात सादर कराव्यात त्या प्रश्नाचे तात्काळ निराकरण करण्यात येईल, अशी माहिती बैठकीत दिली.
यावेळी डॉ. पद्मसिंह पाटील आणि आमदार ओमराजे निंबाळकर यांनी आपले विचार मांडले. या आढावा बैठकीस जि.प.सदस्य, संबंधित सभापती, पंचायत समिती सदस्य, तालुकास्तीय अधिकारी, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, नरेगा कर्मचारी, नगर पालिका कर्मचारी पत्रकार आदी मोठया संख्येने उपस्थित होते.