उस्मानाबाद :- देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ् येथील जिल्हाधिकारी कार्यालयात  सोमवारी दोन मिनीटे स्तब्धता पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्ञानोबा फुलारी, उपजिल्हाधिकारी बी.एस. चाकूरकर, मिनाज मुल्ला, के.ए. तडवी, चंद्रकांत सूर्यवंशी आणि शिल्पा करमरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
विविध शासकीय कार्यालयातही हुतात्मा दिनानिमित्त दोन मिनीटे स्तब्धता पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.         
 
Top