उस्मानाबाद -: शेतीतील उत्पादित मालाच्या खरेदी-विक्रीसाठी बाजार समित्यांची स्थापना झाली आहे. शेतकरी व व्यापारी यांचा सहभाग घेऊन शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीने त्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ मिळण्यासाठी द्राक्ष व आंब्यासारख्या उत्पादित माल निर्यात करावा. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ मिळून आर्थीक उन्नती होईल, असे प्रतिपादन पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील-चाकूरकर यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समिती, मुरुम ता. उमरगा येथील माधवराव पाटील व्यापारी संकुलाचे उदघाटन आज त्यांच्या शुभहस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील तर प्रमुख पाहूणे म्हणून पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा आमदार बसवराज पाटील, शैलेस पाटील, श्री.प्रदीप राठी, माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे गुरुजी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूराव पाटील, मुरुम नगर परिषदेचे नगराध्यक्ष व्यंकट जाधव आदिंची उपस्थिती होती.
राज्यपाल पाटील म्हणाले की, व्यापारी संकुलला माधवराव पाटील हे नाव दिले त्यांचे नाव व कार्याची आठवण सर्वांना निरंतर स्मरणात राहील. सर्वांनी त्यांची प्रेरणा घेऊन काम केले तर अतिशय वेगाने काम होईल. व्यापारी संकुल चांगल्या दर्जाची बांधली असून या भागातील दुकानदार-व्यापारी विविध चांगले व्यवसाय सुरु करतील. या कामाबरोबरच सिंचन, रासायनीक खते, कृषी विश्व विदयालय, राष्ट्रीय स्तरावरील संशोधन शाळा उभारणीसाठी प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषण करतांना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, पिण्याच्या पाण्यासाठी उस्मानाबादकरांना खास बाब म्हणून 51 कोटी रुपये मंजूर केले होते. त्यामुळे त्यांचा पिण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली लागणार आहे. सहकार क्षेत्रातील बंद पडलेली साखर कारखाने सहकारी तत्वावरच चालू देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, सहकार क्षेत्रातील चळवळीचे महत्व कमी होणार नाही यासाठी सहाकार कायद्यात नव्या घटना सुधारणा करण्याचा निर्णयही झाला असून त्यावर पुढील अधिवेशात चर्चा होणार आहे. शेतक-यांच्या हितासाठी बाजार समिती असून त्यांच्या शेतीतील मालाची विक्रीला योग्य भाव मिळण्याकरिता प्रस्ताव सादर करावेत. दुष्काळात जनावरांच्या संगोपन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. या भागातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी व शेतीच्या विकासासाठी रोजगार हमी योजना, शेततळे व पाझर तलावाची कामे तातडीने हाती घ्यावीत, असे त्यांनी सांगितले.
कृषी उत्पन्न बाजार समिती, मुरुम ता. उमरगा येथील माधवराव पाटील व्यापारी संकुलाचे उदघाटन आज त्यांच्या शुभहस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील तर प्रमुख पाहूणे म्हणून पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा आमदार बसवराज पाटील, शैलेस पाटील, श्री.प्रदीप राठी, माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे गुरुजी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूराव पाटील, मुरुम नगर परिषदेचे नगराध्यक्ष व्यंकट जाधव आदिंची उपस्थिती होती.
राज्यपाल पाटील म्हणाले की, व्यापारी संकुलला माधवराव पाटील हे नाव दिले त्यांचे नाव व कार्याची आठवण सर्वांना निरंतर स्मरणात राहील. सर्वांनी त्यांची प्रेरणा घेऊन काम केले तर अतिशय वेगाने काम होईल. व्यापारी संकुल चांगल्या दर्जाची बांधली असून या भागातील दुकानदार-व्यापारी विविध चांगले व्यवसाय सुरु करतील. या कामाबरोबरच सिंचन, रासायनीक खते, कृषी विश्व विदयालय, राष्ट्रीय स्तरावरील संशोधन शाळा उभारणीसाठी प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषण करतांना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, पिण्याच्या पाण्यासाठी उस्मानाबादकरांना खास बाब म्हणून 51 कोटी रुपये मंजूर केले होते. त्यामुळे त्यांचा पिण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली लागणार आहे. सहकार क्षेत्रातील बंद पडलेली साखर कारखाने सहकारी तत्वावरच चालू देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, सहकार क्षेत्रातील चळवळीचे महत्व कमी होणार नाही यासाठी सहाकार कायद्यात नव्या घटना सुधारणा करण्याचा निर्णयही झाला असून त्यावर पुढील अधिवेशात चर्चा होणार आहे. शेतक-यांच्या हितासाठी बाजार समिती असून त्यांच्या शेतीतील मालाची विक्रीला योग्य भाव मिळण्याकरिता प्रस्ताव सादर करावेत. दुष्काळात जनावरांच्या संगोपन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. या भागातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी व शेतीच्या विकासासाठी रोजगार हमी योजना, शेततळे व पाझर तलावाची कामे तातडीने हाती घ्यावीत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री म्हणाले की, बाजारपेठ वृध्दीकृत करण्यासाठी विश्वासार्हता महत्वाची आहे. माधवराव पाटील यांनी केलेल्या सहकार क्षेत्रातील कामांची त्यांनी आठवण करुन दिली. या भागात बाजार समिती, शिक्षण व पाण्याबाबतच्या केलेल्या कामाचे कौतूक केले. उस्मानाबाद शहर टॅकरमुक्त करणार असल्याचे त्यांनी सांगून तुळजाभवानी कारखाना व जिल्हा बँकेच्या विकासासाठी सहकार मंत्र्यांनी सर्वातोपरी मदत करण्याची विनंती केली.
आमदार बसवराज पाटील म्हणाले की, रोजगार निर्मिती करण्याच्या उद्देशाने शेतकरी-व्यापारी यांनी सोयीने व्यवसाय करण्यासाठी या व्यापारी संकुले तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे विकास होणार असून बाजार समितीचा कायापालट होईल. प्रत्येक घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. सहकार क्षेत्रात काम करतांना मुरुम व किल्लारी येथील सहकारी कारखान्याने या हंगामात सुरु असून त्यांचे गाळपाचे उदिष्ट प्रगतीपथावर आहेत.
मुरुम बाजार समितीचे सभापती बापूराव पाटील यांनी प्रास्ताविकात बाजार समिती मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कामांचा आढावा सादर करुन पुढील काळात बाजार समिती संगणकीकृत करुन एस.एम.एस.द्वारे शेतकऱ्यांना याची माहिती देण्याचा मानस असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास विविध पदाधिकारी, बाजार समितीचे संचालक मंडळ, शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष हुलपले यांनी केले.
आमदार बसवराज पाटील म्हणाले की, रोजगार निर्मिती करण्याच्या उद्देशाने शेतकरी-व्यापारी यांनी सोयीने व्यवसाय करण्यासाठी या व्यापारी संकुले तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे विकास होणार असून बाजार समितीचा कायापालट होईल. प्रत्येक घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. सहकार क्षेत्रात काम करतांना मुरुम व किल्लारी येथील सहकारी कारखान्याने या हंगामात सुरु असून त्यांचे गाळपाचे उदिष्ट प्रगतीपथावर आहेत.
मुरुम बाजार समितीचे सभापती बापूराव पाटील यांनी प्रास्ताविकात बाजार समिती मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कामांचा आढावा सादर करुन पुढील काळात बाजार समिती संगणकीकृत करुन एस.एम.एस.द्वारे शेतकऱ्यांना याची माहिती देण्याचा मानस असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास विविध पदाधिकारी, बाजार समितीचे संचालक मंडळ, शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष हुलपले यांनी केले.