उस्मानाबाद :- जिल्ह्यातील कोरड्या पडलेल्या विविध तलावातून गाळ नेऊन तो शेतात टाकून जमीन सुपीक करण्याच्या प्रयत्नाने आता वेग घेतला आहे. अधिकाधिक शेतकरी स्वत:हून हा गाळ आपल्या शेतात नेण्यासाठी पुढाकार घेत आहेत. शेतकरी स्वयंस्फूर्तीने व स्वत:च्या खर्चातून तलाव अथवा सिंचन प्रकल्पातील गाळ नेत असल्याने तलावांची पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ होणार असून पडिक जमिन उपजावू होणार आहे. आतापर्यंत जिल्ह्याच्या 99 तलावांमधून तब्बल 43 लाख 11 हजार 108 घनमीटर इतका गाळ काढण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील 4 हजार 311 एकर एवढी जमीन आता उपजावू होणार आहे तर आगामी काळात या तलावांच्या पाणीसाठ्यात 4.31 दशलक्ष घनमीटर एवढी वाढ होणार आहे.
जिल्ह्यात सध्या बहुतांशी सिंचन प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामुळे त्याठिकाणचा गाळ नेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. हा गाळ आपल्या जमिनीत टाकून जमिन सुपीक करण्याचा प्रयत्न या माध्यमातून शेतकरी स्वत:हून करीत आहेत. गाळ नेताना शेतकऱ्यांकडून कोणतीही रॅायल्टी आकारण्यात येत नसल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनीही शेतकऱ्यांना हा गाळ नेण्याचे आवाहन केले आहे. उस्मानाबाद पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी अभियंता व्ही.बी. कोटेचा यांनीही शेतकऱ्यांचा सहभाग ही कौतुकास्पद गोष्ट असल्याचे सांगितले.
सध्या जिल्ह्यातील 113 प्रकल्पात 3 कोटी 72 लाख 15 हजार 380 घनमीटर इतका गाळ आहे. सध्या 99 तलावातून शेतकरी गाळ नेत आहेत. जिल्ह्यात सध्या 78 पोकलेन, 208 जेसीबी, 1159 ट्रॅक्टर आणि 440 टिप्परद्वारे गाळ काढला जात आहे. सध्या दररोज 1 लाख 18 हजार 257 घनमीटर गाळ काढला जात आहे. या कामांमुळे लोकसहभागातून आतापर्यंत काढलेल्या एकूण गाळामुळे 4.31 दलघमी पाणीसाठा निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या 17 कोटी 24 लाख रुपयांच्या खर्चात बचत झाली आहे. तसेच नापीक असणारी जमीनही सुपीक होणार असल्याने या जमिनीची वाढीव किंमत सुमारे 215 कोटी 55 लाख इतकी झाली आहे. सध्या जिल्ह्यात शेतक-यांनी 43 कोटी 11 लाख एवढया रकमेचा गाळ काढला आहे. या गाळामुळे होणारा लाभ मात्र 232 कोटी 79 लाख इतका असल्याने अधिकाधिक शेतकरी स्वत:हून हा गाळ आपल्या शेतात नेण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
जिल्ह्यात सध्या बहुतांशी सिंचन प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामुळे त्याठिकाणचा गाळ नेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. हा गाळ आपल्या जमिनीत टाकून जमिन सुपीक करण्याचा प्रयत्न या माध्यमातून शेतकरी स्वत:हून करीत आहेत. गाळ नेताना शेतकऱ्यांकडून कोणतीही रॅायल्टी आकारण्यात येत नसल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनीही शेतकऱ्यांना हा गाळ नेण्याचे आवाहन केले आहे. उस्मानाबाद पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी अभियंता व्ही.बी. कोटेचा यांनीही शेतकऱ्यांचा सहभाग ही कौतुकास्पद गोष्ट असल्याचे सांगितले.
सध्या जिल्ह्यातील 113 प्रकल्पात 3 कोटी 72 लाख 15 हजार 380 घनमीटर इतका गाळ आहे. सध्या 99 तलावातून शेतकरी गाळ नेत आहेत. जिल्ह्यात सध्या 78 पोकलेन, 208 जेसीबी, 1159 ट्रॅक्टर आणि 440 टिप्परद्वारे गाळ काढला जात आहे. सध्या दररोज 1 लाख 18 हजार 257 घनमीटर गाळ काढला जात आहे. या कामांमुळे लोकसहभागातून आतापर्यंत काढलेल्या एकूण गाळामुळे 4.31 दलघमी पाणीसाठा निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या 17 कोटी 24 लाख रुपयांच्या खर्चात बचत झाली आहे. तसेच नापीक असणारी जमीनही सुपीक होणार असल्याने या जमिनीची वाढीव किंमत सुमारे 215 कोटी 55 लाख इतकी झाली आहे. सध्या जिल्ह्यात शेतक-यांनी 43 कोटी 11 लाख एवढया रकमेचा गाळ काढला आहे. या गाळामुळे होणारा लाभ मात्र 232 कोटी 79 लाख इतका असल्याने अधिकाधिक शेतकरी स्वत:हून हा गाळ आपल्या शेतात नेण्यासाठी पुढाकार घेत आहेत.