उस्मानाबाद :-  जिल्हयातील सर्व शेतकरी बांधवांनी MRC -7351 BT-11 कापुस व इतर बियाणेची खरेदी करताना अधिकृत बियाणे विक्रेत्यांकडून महाराष्ट्र शासनाने शिफारस असलेले वैध बियाणे छापील किंमतीनुसार खरेदी पावती घेवूनच खरेदी करावे. बियाणे निकृष्ट दर्जाचे प्राप्त झाल्यास किंवा त्याबाबत काही तक्रार असल्यास तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी, पंचायत समिती अथवा कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्याकडे लेखी स्वरुपात तक्रार दाखल करावी, असे आवाहन कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी केलेले आहे.
 
Top