उस्मानाबाद :- सन 2012-2013 मध्ये राज्यामध्ये पडलेला दुष्काळ विचारात घेऊन उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन होण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय सुक्ष्म सिंचन अभियान अंतर्गत सन 2012-2013 मध्ये शेतक-यांचे ऑनलाईन प्रस्ताव स्विकारण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. तरी जिल्हयातील सर्व इच्छुक शेतक-यांनी आपले तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषि अधिकारी  व मान्यताप्राप्त कंपन्यांच्या वितरकाशी संपर्क साधुन लागणा-या कागदपत्रांची पुर्तता करुन दि. 31 मार्चपर्यंत  ठिबक, तुषार संच बसवून घ्यावेत आणि  या योजनेचा जास्तीत जास्त शेतक-यांनी लाभ घ्यावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद यांनी आवाहन केले आहे
 
Top