उस्मानाबाद -: जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे यावर्षी वाढदिवस अत्यंत साध्यापद्धतीने साजरा करावा असे आवाहन खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
    या संदर्भात देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना मोठे हाल सहन करावे लागत आहेत. यामुळे दि. 1 जून रोजी वाढदिवस साधेपणाने साजरा करून नागरिकांसाठी पाणी, जनावरे व पशुपक्षांसाठी चारा तसेच पाणपोई, वृक्षलागवड, पशुखाद्य उपलब्ध करण्यावर भर द्यावा. पक्षाच्या सर्व तालुकाध्यक्षांनी व सर्व आघाड्यांच्या प्रमुखांनी येणार्‍या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त वृक्षारोपन करावे, असे आवाहन खासदार डॉ. पाटील यांनी केले आहे.
 
Top