उस्मानाबाद -: मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्:मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2012-13 साठी राज्य शासनाच्या वतीने देणा-या पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दि.10 जुलै पर्यंत पाठविता येणार आहेत.
दि.1 एप्रिल,2012 ते 31 मार्च,2013 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाटय मंदीर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड,प्रभादेवी, मुंबई-400025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्व साधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामुल्य उपलब्ध होतील. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर what is new या शीर्षकाखाली प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील. लेखक /प्रकाशक यांनी प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहितय आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात दि.10 जुलै,2013 पर्यंत या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल कराव्यात,असे आवाहन सचिव,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई आणि जिल्हाधिकारी,उस्मानाबाद यांनी केले आहे.
दि.1 एप्रिल,2012 ते 31 मार्च,2013 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाटय मंदीर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड,प्रभादेवी, मुंबई-400025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्व साधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामुल्य उपलब्ध होतील. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर what is new या शीर्षकाखाली प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील. लेखक /प्रकाशक यांनी प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहितय आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात दि.10 जुलै,2013 पर्यंत या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल कराव्यात,असे आवाहन सचिव,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई आणि जिल्हाधिकारी,उस्मानाबाद यांनी केले आहे.