उस्मानाबाद :- जिल्ह्यात येत्या 23 जून रोजी वट पोर्णीमा, दि.25 जून रोजी शव-ए-बारात, आणि 26 जून रोजी राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी होत आहे. जिल्ह्यात 3 सार्वत्रिक व 30 पोट ग्रामपंचायत निवडणूकीची दि. 24 ते 25 जून पर्यंत निवडणूक प्रक्रिया आणि जिल्ह्यात सध्या पाणी टंचाई असून या कालावधीत खत,बि-बियांणावरुन विविध पक्ष/संघटना यांचेकडून आंदोलनात्मक कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भात अप्पर जिल्हादंडाधिकारी संजय गायकवाड यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, उपरोक्त कालावधीत जिल्हयात नागरीकांना शस्त्र किंवा तत्सम वस्तु बाळगण्यास अथवा त्यांची वाहतूक करण्यात बंदी राहील.
आवेशी भाषणे, अंगविक्षेप, विडंबनात्मक नक्कला करता येणार नाही. सभ्यतेस व नितिमत्तेस बाधा येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, नकाशे, घोषणा फलक, चिन्ह आणि अशा अन्य वस्तु जवळ बाळगता येणार नाहीत. व्यक्ति किंवा समुहाच्या भावना जाणूनबुजून दुखविण्याच्या उद्देशाने वाद्य वाजविता येणार नाही अथवा गाणी म्हणता येणार नाहीत. तसेच पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तिंना एकत्र येण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणूका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचा भंग करणा-यांविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल. हे आदेश आजपासून जारी करण्यात आले असून ते 29 जून रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील.
आवेशी भाषणे, अंगविक्षेप, विडंबनात्मक नक्कला करता येणार नाही. सभ्यतेस व नितिमत्तेस बाधा येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, नकाशे, घोषणा फलक, चिन्ह आणि अशा अन्य वस्तु जवळ बाळगता येणार नाहीत. व्यक्ति किंवा समुहाच्या भावना जाणूनबुजून दुखविण्याच्या उद्देशाने वाद्य वाजविता येणार नाही अथवा गाणी म्हणता येणार नाहीत. तसेच पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तिंना एकत्र येण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणूका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचा भंग करणा-यांविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल. हे आदेश आजपासून जारी करण्यात आले असून ते 29 जून रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील.