उस्मानाबाद :जिल्ह्यात पडलेला दुष्काळाचे सावट लक्षात घेवून उपलब्ध पाण्याचे योग्नियोजन करण्यासाठी  राष्‍ट्रीय सुक्ष्म सिंचन अभियान 2012-13 मध्ये शेतक-यांचे ऑनलाईन प्रस्ताव स्वीकारण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. जिल्हयातील मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी व मान्यता प्राप्त कंपन्यांचे वितरकांनी  सुक्ष्म सिंचन योजनेसाठी प्रस्ताव 30 जुनपर्यंत ऑनलाईन करुन घ्यावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.  
      मुदतीनंतरचे पाठविलेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी,असेही कळविण्यात आले आहे.
 
Top