उस्मानाबाद :- कोणत्याही परिस्थितीत शेतक-यांना या खरीप हंगामात खतांचा आणि बियाण्यांचा तुटवडा जाणवणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी कृषी विभागाला दिले.
जिल्ह्यातील निविष्ठा उपलब्धतेबाबत आज पालकमंत्री चव्हाण यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. खासदार डा. पद्मसिंह पाटील, आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व ज्ञानराज चौगुले, जि. प. अध्यक्ष डा. सुभाष व्हट्टे, जिल्हाधिकारी ज्ञानोबा फुलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास, जि. प. उपाध्यक्ष संजय पाटील दूधगावकर, कृषी सभापती पंडित जोकार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जि.प.चे कृषी विकास अधिकारी मदनलाल मिणीयार तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. अशा परिस्थितीत विशेषता सोयाबीन, कापूस यांच्या बियाण्यांचा तुटवडा जाणवता कामा नये. काही शेतकरी विशिष्ट बियाण्यांचा आग्रह धरत असले तरी कृषी विभागाने याबाबत जागरुकता निर्माण करुन शेतकऱ्यांना वस्तुस्थिती समजावून द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कृषी आयुक्तालयाकडून जिल्ह्यासाठी करण्यात आलेला बियाण्यांचा पुरवठा, खताचे आवंठन, खरीपाचे नियोजन, गुणनियंत्रणासाठी भरारी पथकांची स्थापना आदींबाबत पालकमंत्री चव्हाण यांनी तपशीलवार माहिती घेतली. या बैठकीसाठी विविध खत कंपन्यांचे प्रतिनिधीही हजर होते. त्यांच्याकडूनही श्री. चव्हाण यांनी खत उपलब्धतेबाबत माहिती घेतली आणि कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील शेतक-यांना खत पुरवठ्याची टंचाई जाणवणार नाही, याबाबत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
बांधावर खत वाटप उपक्रम चांगला असून त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. खत व बियाणे वाटपाबाबत शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचना श्री. चव्हाण यांनी कृषी विभागाला केल्या.
शंकर .तोटावार यांनी यावेळी जिल्ह्यातील खरीप हंगाम यशस्वी पार पाडण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर भरारी दक्षता पथके स्थाप करण्यात आल्याचे सांगितले. याशिवाय कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे बियाणे विक्री करण्यात येत आहे. बियाणे व खत उपलब्धतेबाबत शेतकऱ्यांच्या माहितीसाठी शासनाने 18002334000 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन दिल्याचे त्यांनी सांगितले. विविध लोकप्रतिनिधींनीही शेतक-यांची मागणी असलेल्या बियाण्यांच्या पुरवठ्याबाबत योग्य ती कार्यवाही कृषी विभागाने करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
जिल्ह्यातील निविष्ठा उपलब्धतेबाबत आज पालकमंत्री चव्हाण यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. खासदार डा. पद्मसिंह पाटील, आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व ज्ञानराज चौगुले, जि. प. अध्यक्ष डा. सुभाष व्हट्टे, जिल्हाधिकारी ज्ञानोबा फुलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास, जि. प. उपाध्यक्ष संजय पाटील दूधगावकर, कृषी सभापती पंडित जोकार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जि.प.चे कृषी विकास अधिकारी मदनलाल मिणीयार तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. अशा परिस्थितीत विशेषता सोयाबीन, कापूस यांच्या बियाण्यांचा तुटवडा जाणवता कामा नये. काही शेतकरी विशिष्ट बियाण्यांचा आग्रह धरत असले तरी कृषी विभागाने याबाबत जागरुकता निर्माण करुन शेतकऱ्यांना वस्तुस्थिती समजावून द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कृषी आयुक्तालयाकडून जिल्ह्यासाठी करण्यात आलेला बियाण्यांचा पुरवठा, खताचे आवंठन, खरीपाचे नियोजन, गुणनियंत्रणासाठी भरारी पथकांची स्थापना आदींबाबत पालकमंत्री चव्हाण यांनी तपशीलवार माहिती घेतली. या बैठकीसाठी विविध खत कंपन्यांचे प्रतिनिधीही हजर होते. त्यांच्याकडूनही श्री. चव्हाण यांनी खत उपलब्धतेबाबत माहिती घेतली आणि कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील शेतक-यांना खत पुरवठ्याची टंचाई जाणवणार नाही, याबाबत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
बांधावर खत वाटप उपक्रम चांगला असून त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. खत व बियाणे वाटपाबाबत शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचना श्री. चव्हाण यांनी कृषी विभागाला केल्या.
शंकर .तोटावार यांनी यावेळी जिल्ह्यातील खरीप हंगाम यशस्वी पार पाडण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर भरारी दक्षता पथके स्थाप करण्यात आल्याचे सांगितले. याशिवाय कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे बियाणे विक्री करण्यात येत आहे. बियाणे व खत उपलब्धतेबाबत शेतकऱ्यांच्या माहितीसाठी शासनाने 18002334000 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन दिल्याचे त्यांनी सांगितले. विविध लोकप्रतिनिधींनीही शेतक-यांची मागणी असलेल्या बियाण्यांच्या पुरवठ्याबाबत योग्य ती कार्यवाही कृषी विभागाने करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
जलपुनर्भरण आणि पाऊस पाणी संकलनासाठी लोकप्रतिनिधींचे आवाहन
यावर्षी जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागला. हे संकट पुन्हा ओढवू नये, यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी जलपुनर्भरण आणि पाऊस पाणी संकलनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी केले आहे.
पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, खासदार डा. पद्मसिंह पाटील, आमदार ओमराजे निंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हा परिषद अध्यक्ष डा. सुभाष व्हट्टे, उपाध्यक्ष संजय पाटील दूधगावकर यांनी आज हे आवाहन केले. कृषी विभागाची खरीप आढावा बैठक झाल्यानंतर त्यांनी हे आवाहन केले. मागील वर्षी जिल्ह्याला तीव्र स्वरुपाची पाणीटंचाई अनुभवावयास लागली. नागरिकांना पाणी उपलब्ध करुन देण्याबाबत प्रशासनाने विविध माध्यमातून प्रयत्नही केले. मात्र, हे संकट पुन्हा ओढवू नये यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चव्हाण व इतर मान्यवरांनी हे आवाहन केले आहे. शासकीय कार्यालयांनीही पाऊस पाणी संकलनाबाबत पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी या बैठकीत केले.
पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, खासदार डा. पद्मसिंह पाटील, आमदार ओमराजे निंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हा परिषद अध्यक्ष डा. सुभाष व्हट्टे, उपाध्यक्ष संजय पाटील दूधगावकर यांनी आज हे आवाहन केले. कृषी विभागाची खरीप आढावा बैठक झाल्यानंतर त्यांनी हे आवाहन केले. मागील वर्षी जिल्ह्याला तीव्र स्वरुपाची पाणीटंचाई अनुभवावयास लागली. नागरिकांना पाणी उपलब्ध करुन देण्याबाबत प्रशासनाने विविध माध्यमातून प्रयत्नही केले. मात्र, हे संकट पुन्हा ओढवू नये यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चव्हाण व इतर मान्यवरांनी हे आवाहन केले आहे. शासकीय कार्यालयांनीही पाऊस पाणी संकलनाबाबत पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी या बैठकीत केले.