उस्मानाबाद -: सन 2011-2012 अखेर किंवा तत्पुर्वी कार्यालयाने दिलेल्या नाहरकत प्रमाणपत्रानुसार नियुक्ती केलेल्या शिक्षकांच्या नियुक्त्याना वैयक्तिक मान्यता देण्यासाठी येथील आर्य चाणक्य विद्यालय, उस्मानाबादेत दि. 28 ते 30 ऑगस्ट या कालावधीत शिबीर आयोजित  करण्यात आले आहे.
         ज्या मुख्याध्यापकांने दि. 2 मे 2012 पुर्वी शिक्षणाधिकारी (मा.) जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांची भरती  प्रक्रियेस पूर्वपरवानगी घेवून ज्या शिक्षकांची नियुक्ती केली आहे. अशा शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता घेण्यासाठीचे प्रस्ताव शिबीरात दाखल करावेत. त्याप्रमाणे 2 मे 12 पुर्वी पुर्वमान्यता घेवून नियुक्त केलेल्या शिक्षकांचे प्रस्ताव ुत्रटी पुर्ततेसाठी या कार्यालयाकडे प्रलंबित असतील त्या प्रस्तावातील त्रुटीची पुर्तता शिबीर कालावधीत करण्यात येईल.
          ज्या शिक्षकांची  नियुक्ती  2 मे 2012 च्या  शासन निर्णयापुर्वी  शैक्षणिक वर्ष 2012-13 साठीपुर्व परवानगीने भरती प्रक्रिया सुरु केली आहे, अशा शाळांनी पुराव्यासह प्रस्ताव  शिक्षणाधिकारी (मा.) जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांच्यामार्फत विभागीय शिक्षण उपसंचालक, शासनाकडे पाठविणे आवश्यक असून 2 मे 12 च्या निर्णयानंतर अनुदानित शाळातील गणित/ विज्ञान/ इंग्रजी विषय पदभरतीस मान्यतेचे प्रस्ताव या कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.
            सदरील प्रस्ताव शिबीरात दाखल करावेत. 2 मे च्या शासन निर्णयानुसार खाजगी शाळेतील अनुदानित पदावर नियुक्त केलेल्या शिक्षण  सेवकांचे वैयक्तिक मान्यतेचे प्रस्ताव स्विकारले जाणार नाही. विनाअनुदानीत पदावर या कार्यालयाच्या पूर्वपरवानगीने भरती प्रक्रिया करुन नियुक्त केलेल्या शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेचे प्रस्ताव शिबीर कालावधीतच सादर करावेत, असे शिक्षणाधिकारी (मा.) जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.                                       
 
Top